Akola News : राज्यात १ ऑगस्टपासून सुरु झालेली ई-पीक पाहणी अंतर्गत जिल्ह्यात ३ लाख ३२ हजार ४०२ शेतकऱ्यांपैकी २ लाख १२ हजार ८१८ शेतकऱ्यांनी मोबाईल अँपद्वारे तर तलाठीस्तरावर ५८ हजार ३२१ शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केली.
शेतकरी व तलाठी स्तरावरील ८२.१० टक्के ई-पीक पाहणी पूर्ण झाली आहे. शासनाकडून २०२१ पासून ई-पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची नोंद ॲपद्वारे करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली.
त्यामुळे ई-पीक पाहणीला प्रतिसाद मिळतो आहे. यंदाही शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी १ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली. ई-पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना पीकविमा आणि पीककर्जापासून वंचित राहावे लागणार असल्याच्या सूचना शासनाने निर्गमित केल्या आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.