Subhash Bhamre Agrowon
ॲग्रो विशेष

MP Dr. Subhash Bhamre : हरणबारी उजवा कालव्यासाठी ५५ कोटींचा प्रस्ताव सादर : डॉ. सुभाष भामरे

Team Agrowon

Nashik News : नाशिक तालुक्यातील हरणबारी धरणाच्या डावा कालव्यासाठी ४१ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली असून उजवा कालव्यासाठी शासनाकडे ५५ कोटींचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सादर केला असल्याची माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली.

डॉ. भामरे यांच्या येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की हरणबारी उजवा कालव्याचे पाणी सातमानेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या कालव्याची शून्य ते २१ किलोमीटरपर्यंतची दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

तळवाडे भामेरपर्यंत कालवा पूर्ण झालेला असून यावर्षी त्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच केळझर डावा कालवा व केळझर चारी क्रमांक आठचे काम पूर्ण झाले असून त्याच्या दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

या दोन्ही कालव्यांचा जामोटी, दगडपाडा, मुल्हेर, मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भूयाने, ताहाराबाद या गावांना फायदा होणार आहे. यासह २१ किमीपासून तर सातमानेपर्यंत पुढील गावांना सिमेंट पाईपलाईनद्वारे पाणी मिळणार असून पाणी आरक्षण केले आहे.

सर्वेक्षण करून त्या कामासाठी ३८ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाच्या ईपीसी मीटिंगमध्ये सादर करणार आहे. या कालव्याचा पारनेर, बिजोटे, निताने, आखतवाडे, गोराने, फोफिर, कोटबेल, खिरमानी, नळकस, कुपखेडा, सारदे, वायगाव, जुने रातीर, रामतीर, देवळाने, सुराने, सातमाने या गावांना फायदा होणार आहे.

तसेच केळझर वाढीव चारी क्रमांक ८ भाक्षी, मुळाने या गावापासून अजमेर सौंदाणेपर्यंत होणार असून त्यासाठी १७ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.

बागलाण तालुक्यातील कालव्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचेही डॉ. भामरे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT