Economic Survey Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Economic Survey Crop Insurance : २०२४ मध्ये पीक विम्याखालील क्षेत्रात १९ टक्के वाढ; आर्थिक सर्वेक्षण अहवालाची आकडेवारी

crop Insurance scheme : आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २४ राज्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला. तर विमा कंपन्यांची संख्या १५ वर पोहचली आहे. यापूर्वी २०२०-२१ या योजनेत २० राज्य आणि ११ कंपन्यांचा समावेश होता.

Dhananjay Sanap

Economic Survey in Parliament : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी (ता.३१) आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर केला. देशातील कृषी क्षेत्राची अवस्था गंभीर असतानाही कृषी क्षेत्रात २०२४-२५ दुसऱ्या तिमाहीत कृषी विकास दर ३.५ टक्के राहिल्याचं चित्र आर्थिक सर्वेक्षण अहवालात रंगण्यात आलं आहे. तसेच उत्पादनातील वाढ, बहूपीक पद्धती आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्यामुळे कृषी विकास दर स्थिर असल्याचा दावाही आर्थिक सर्वेक्षणात करण्यात आला आहे. तर पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर पोहचल्याचा दावा अहवालात करण्यात आहे.

आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २४ राज्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभाग घेतला. तर विमा कंपन्यांची संख्या १५ वर पोहचली आहे. यापूर्वी २०२०-२१ या योजनेत २० राज्य आणि ११ कंपन्यांचा समावेश होता. २०१६ साली केंद्र सरकारने पीकविमा योजना सुरू केली. परंतु या योजनेत काही राज्य बाहेर पडली होती. बाहेर पडलेली राज्य आता पुन्हा केंद्राच्या योजनेत सहभागी होत आहेत, असं अहवालात सांगण्यात आलं आहे.

पीकविमा योजनेतील तांत्रिक सुधारणामुळे शेतकऱ्यांच्या प्रीमियम दरात ३२ टक्के घट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी प्रीमियम भरावा लागत असल्याने २०२४ मध्ये ४ कोटी शेतकऱ्यांनी योजनेत नावनोंदणी केली. २०२३ च्या तुलनेत पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २६ टक्के अधिक आहे. त्यामुळे २०२४ मध्ये ६०० लाख हेक्टर क्षेत्र विम्याखाली आलं. जे की, २०२३ मध्ये ५०० लाख हेक्टर होतं. म्हणजेच १९ टक्के जास्त क्षेत्र पीक विम्याखाली आल्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवालात दावा केला आहे.

केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर भरपाई देण्यासाठी पीकविमा योजना राबवतं. शेतकरी नोंदणीच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा आणि प्रीमियमसाठी जगातील तिसऱ्या क्रमांकाची योजना असल्याचं सर्वेक्षण अहवालात सांगण्यात आलं आहे. या योजनएतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे. तसेच अलीकडेच योजनेत येस टेक, विंडस आणि क्रॉप आयसी २८ तंत्रज्ञान लॉच केलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच या योजनेतुन पिक विमा कंपन्यांची उखळ पांढरी केली जात असल्याचा आरोप केला जातो. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईपासून वंचित राहतात. परिणामी या योजनेत पारदर्शकता आणण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT