जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीला मंगळवारी (ता. २७) १५०० ते ४००० रुपये क्विंटल दर मिळाला. हिरव्या मिरचीची २८ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीची आवक बऱ्या प्रमाणात असली, तरी मागणी अधिक असल्याने दरवाढ झाल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले.
मिरचीची आवक जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहूर, शेंदूर्णी व परिसरातील गावांमधून होते. बाजारात वाटाण्याची १८ क्विंटल आवक झाली. वाटाण्याला १००० ते १८०० रुपये, तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता. शेवगा शेंगांची सहा क्विंटल आवक झाली. त्यांना २००० ते ३२०० रुपये तर सरासरी २५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. लिंबूची नऊ क्विंटल आवक झाली. लिंबाला १००० ते २००० रुपये तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर होता. मुळ्याची सहा क्विंटल आवक झाली. मुळ्यास १००० ते १२०० रुपये तर सरासरी १००० रुपये क्विंटल दर होता.
आल्याची (अद्रक) १५ क्विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल दर होता. बटाट्याची २५० क्विंटल आवक झाली. बटाटयाला ६०० ते ११०० रुपये, तर सरासरी ८०० रुपये क्विंटल दर होता. भेंडीची १८ क्विंटल आवक झाली. भेंडीला १२०० ते २२०० रुपये, तर सरासरी १५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १५ क्विंटल आवक झाली. कोबीला ३०० ते ६०० रुपये, तर सरासरी ५०० रुपये क्विंटल दर होता.
बाजार समितीत लाल कांद्याची ४३० क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला ७५० ते १५५० रुपये, तर सरासरी १२०० रुपये क्विंटल असा दर होता. कोथींबिरीची १२ क्विंटल आवक झाली. कोथिंबीरीला ४०० ते १००० रुपये, तर सरासरी ६०० रुपये क्विंटल दर मिळाला. मेथीची सहा क्विंटल आवक झाली. मेथीला ५०० ते १००० रुपये, तर सरासरी ७०० रुपये क्विंटल असा दर होता.
पालकची दोन क्विंटल आवक झाली. पालकास १४०० रुपये क्विंटल दर होता. टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली. टोमॅटोस ४०० ते ७५० रुपये, तर सरासरी ५०० रुपये क्विंटल असा दर होता. वांग्यांची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल ३०० ते ५०० तर सरासरी ४०० रुपये दर होता.