Water Shortage
Water Shortage Agrowon
ताज्या बातम्या

Water Shortage : पावसाळ्यात पाणीटंचाई; नागरिकांचे ठिय्‍या आंदोलन

Anil Jadhao 

अंबरनाथ, जि. ठाणे : धरणे, जलाशय दुथडी भरून वाहू लागले तरी अंबरनाथच्या (Ambarnath) पूर्व भागातील भेडसावणारी अनियमित आणि अपुऱ्या दाबाने येणारी पाणी समस्या काही दूर होत नसल्याने संतप्त नागरिकांनी (People Protest) पाणी खात्याच्या कार्यालयामध्ये जाऊन ठिय्या आंदोलन केले.

अंबरनाथच्या पूर्व भागात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने सर्जेराव माहुरकर यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर नागरिकांनी

आंदोलन केले.

पूर्वेकडील ताडवाडी, हाल्याचा पाडा, अश्विनी हॉस्पिटल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनियमित आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाणीटंचाई समस्येला सामोरे जावे लागते.

पावसाळा असल्याने पावसाच्या पाण्याचा नागरिकांना नाईलाजाने वापर करावा लागतो. भर पावसाळ्यातही कधी कधी टँकर मागवावे लागतात, याबाबत माहुरकर यांनी तीव्र शब्‍दांत संताप व्यक्त केला. पाणीटंचाईच्या समस्येवर लवकरच तोडगा काढण्‍यात आला नाही तर

तीव्र आंदोलनाचा थेट इशारा माहुरकर यांनी महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्‍या अधिकाऱ्यांना दिला.

सर्जेराव माहुरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात राजाराम ठाकूर, दिनेश घोडविंदे, निर्मला पाटील, यशोदा भंडारी,

संगीता तपासे आदींचा समावेश होता.

पाणी समस्येवर लवकरात लवकर

तोडगा काढण्याच्या

मागणीचे निवेदन या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT