जायकवाडी, जि. औरंगाबाद : येथील जायकवाडी (Jaykwadi Dam) (नाथसागर) प्रकल्पातून गुरुवारी (ता.१८) सकाळी सहा वाजता १८ दरवाजे चार फुटांनी उघडून ७६,०५६ क्यूसेकने विसर्ग (Water Discharge From Dam) सुरू होता. आवकेनुसार पाण्याचा विसर्ग कमी-अधिक केला जात आहे.
जायकवाडीतील पाण्याची आवक वाढल्याने गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी (ता.१७) दुपारी २ वाजता गोदावरी नदीपात्रात ६६ हजार २४ क्युसेक विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला. गोदावरी नदी काठाच्या गावांनी जीवित व वित्तहानी होणार नाही, यासाठी पाटबंधारे विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी दुपारी प्रकल्पात ९५.५४ टक्के पाणीसाठा होता, तर पाण्याची आवक ७१ हजार २२८ क्युसेकने सुरू होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता प्रकल्पात ७०,२४० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती. तर ७६,०५६ पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्या वेळी १०२.७३ टीएमसी क्षमता असलेल्या या प्रकल्पात एकूण ९९.३९ टीएमसी, तर ७३.३३ टीएमसी जिवंत पाणीसाठा होता, अशी माहिती जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली. उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खराडकर, बंडू अंधारे उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.