Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Swabhimani : वन्य प्राण्यांचा बंदोबस्त न केल्यास पालकमंत्र्यांना झेंडा फडकवू देणार नाही

Wild Animal Crop Damage : नीलगायी, हरीण आणि रानडुकरांचे मोठे कळप शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके फस्त करून मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून वन्य प्राण्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास पालकमंत्र्यांना स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नाही, असा इशारा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी दिला आहे.

नीलगायी, हरीण आणि रानडुकरांचे मोठे कळप शेतातील सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके फस्त करून मोठ्या प्रमाणात नासाडी करीत आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिकांचे नुकसान होत असून याकडे वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांनी इंगोले यांच्यासह उपवनसंरक्षक कार्यालयाला सोमवारी (ता.७) अचानक भेट दिली.

अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबत काहीही केले जात नसल्याने संताप व्यक्त केला. लवकरात लवकर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून पीक नुकसानीची भरपाई देण्यासह या वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केली आहे.

वाशीम जिल्ह्याची निर्मिती होऊन २५ वर्षे झाले आहेत. मात्र अजूनपर्यंत जिल्ह्यात रेस्क्यू टीम उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत पालकमंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत व जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठपुरावा न केल्यास पालकमंत्र्यांना झेंडा फडकू देणार नाही, असा इशारा देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT