
Wild animal Attack Kolhapur News : शाहुवाडी तालुक्यातील जंगली प्राण्यांचा अधिवास धोक्यात असल्याने हे वन्यप्राणी मानवीवस्तीकडे कूच करता असल्याचे चित्र आहे. शेतीच्या राखणीसाठी रात्र माचावर काढावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या वन्यप्राणी, वादळी वारा व विजांचा जिवाला धोका आहे.
शाहूवाडी तालुक्यातील खोतवाडी, मसाई पाठारपासून ते उदगीरी जंगल पट्टयातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांपासून पिके वाचवण्यासाठी जीव धोक्यात टाकून पहारा द्यावा लागत आहे.
वन विभाग लाखो रुपये खर्च करून जंगलातील पाणवठे, तळी या द्वारे वन्यजीव प्राण्यांसाठी पाण्याचे व्यवस्थापन करत आहे. पण हे काम सक्षमपणे होते का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
कारण जर जंगलातील प्राण्यांना जंगलात पाणी मिळाले असते तर हे प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीच्या व शेतीच्या दिशेने आले नसते, अशा भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होते आहेत.
जिवंत पाण्याचे झरे, पाणवठ्यांचे संवर्धनातील त्रुटी यामुळे वन्यप्राणी पाण्यासाठी मानवीवस्तीकडे येत आहेत. वन विभागाकडून प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून जंगलातील पाणवठे, पाण्याचे उगम स्रोत, वाटा, नाले, चरी अशी अनेक कामे केली जातात.
पाऊस पडला की या कामांची निशानी राहत नाही, असा सवालही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
एकंदर याचा फटका शेतीला होत असून शेतकऱ्यांना पिकाच्या रक्षणासाठी रात्र-रात्र शेतात थांबावे लागत आहे. याबाबत वन विभागाशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने संपर्क होऊ शकला नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.