Surat-Chennai Highway Agrowon
ताज्या बातम्या

Surat-Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्ग नुकसानग्रस्तांना बैठकीची प्रतीक्षा

Compensation To Farmer : वाढीव मोबदल्यासाठी तिष्ठताहेत शेतकरी; पुन्हा आंदोलनाचा इशारा

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड हायवेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर, संबंधितांसोबत चर्चेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुंबईत बैठक बोलावली होती.

मात्र, कर्नाटक निवडणुकीमुळे ही बैठक झाली नाही. बाधित शेतकरी सध्या बैठकीच्या प्रतीक्षेत आहेत.

हा प्रश्न लवकर न मिटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांनी दिला आहे.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासमवेत सोलापूर येथील नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला देऊनच सुरत-चेन्नई महामार्गाचे भूसंपादन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते.

याबाबत निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीसह मुंबईत बैठक घेण्याचे ठरले होते.

मात्र, सध्या नुकतीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली आहे. यानंतर शेतकऱ्यांसह मुख्यमंत्री बैठक घेणार होते.

मात्र, तीन महिने झाले तरही बैठक होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढीव मोबदल्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ताबडतोब बैठक घेऊन वाढीव मोबदल्याचा मुद्दा मार्गी लावावा, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांमधून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kerala Assmbly : व्हीबी-जी राम जी रद्द करून मनरेगा योजना लागू करा; केरळ विधानसभेत ठराव मंजूर

Post Harvest Value Addition: कर्नाटकात भात पीक काढणीपश्चात मूल्यवर्धनाचं मॉडेल, चार-पाच पट अधिक उत्पन्नाची हमी

Rural Governance: गावगाड्याचा विकास कधीपर्यंत वाऱ्यावर?

India US Trade Deal: ...तर २०२०-२१ च्या शेतकरी आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, भारत- अमेरिका करारावरून शेतकरी संघटनांचा इशारा

Agricultural Waste : पिकांच्या काढणीनंतर उरलेल्या अवशेषांपासून पॅकेजिंग साहित्याची होणार निर्मिती; शेतकऱ्यांना मिळणार अतिरिक्त उत्पन्न?

SCROLL FOR NEXT