Crop Insurance
Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीक पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली

टीम ॲग्रोवन

नगर : सततचा पाऊस, (Heavy Rainfall) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे (Crop Damage) पंचनामे करण्यासाठी नगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यात पैसे वसूल केले जात आहेत. या बाबत एका शेतकऱ्याने व्हिडिओ (Viral Video Clip) काढून तो व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे. पैसे मागणारे लोक कृषी विभागाचे नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पैसे नेमके कोण वसूल करतो? याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्यात मागील दीड महिन्यात झालेल्या अतिवृष्टी, सततच्या पावसाने कापूस, तूर, सोयाबीन यासह फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा दीड लाख हेक्टरच्या जवळपास पोचला आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भर दिवाळीच्या काळात नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांत जाऊन नुकसानीची पाहणी केली व तातडीने पंचनामे करून अहवाल देण्याच्या आदेश दिले. त्यानुसार पंचनामे सुरू आहेत.

दरम्यान नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी, देसवडे, जेऊरसह अन्य गावांमध्ये पिकांचे पंचनामे करण्यासाठी एकरी २०० ते ४०० रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेण्याचे सांगितले आहे व आतापर्यंत कोणी कोणी पैसे दिले, याची यादीच संबंधित लोक वाचून दाखवत असल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांनीच या प्रकाराचे चित्रीकरण केले.

कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मात्र ‘‘पैसे मागणारे लोक कृषी विभागाचे कर्मचारी नाहीत, त्यांचा व आमचा सबंध नाही’’ असे संबंधित शेतकऱ्यांना स्पष्टीकरण दिले आहे. जर पैसे मागणारे लोक कृषी विभागाचे कर्मचारी नसतील तर ते शेतात जाऊन नुकसानीचे फोटो काढतात कसे? आणि शेतकऱ्यांना पैसे मागण्याचे धाडस करतातच कसे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

आधीच नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झालेले असताना पंचनाम्यासाठी पैशाची वसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांनी मात्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून पैसे मागणारे लोक कोण आहेत? याचा तपास करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करत काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांना या बाबत निवेदनही दिले आहे. व्हायरल व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपने मात्र नेवासा तालुक्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे.

फसवणूक तर होत नाही ना?

अतिवृष्टी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे करणे अपेक्षित आहे. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील पैसे मागणारे लोक महसूल अथवा कृषी विभागाचे नाहीत असे सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे करण्यासाठी खासगी लोकांची नियुक्ती करून शासन आणि शेतकऱ्यांची फसवणूक तर होत नाही ना? असे प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT