Raju Shetti On Barsu Refinery Agrowon
ताज्या बातम्या

Barsu Refinery : मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये; राजू शेट्टींचा इशारा

बारसू रिफायनरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाला बारसूच्या स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.

Team Agrowon

Barsu Refinery Protest बारसू रिफायनरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. रिफायनरीच्या सर्वेक्षणाला (Barsu Refinery Survey) बारसूच्या स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. रिफायनरी विरोधातील आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्जही करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून या भागाला छावणीचे स्वरूप आले आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी आगीशी खेळू नये, असा इशारा शेट्टी यांनी बारसू रिफायनरीप्रकरणी दिला आहे. आंदोलक शेतकरी आणि स्थानिक नागरिकांवर केलेल्या लाठीचार्जप्रकरणी गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी शेट्टींनी केली आहे.

तसेच प्रकल्पासाठी पोलिसांची दंडेलशाही कशासाठी, असा सवालही शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी कोणतीही तारीख न देता, आम्ही थेट बारसूमध्ये जाऊ, असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांवर पोलिसांकडून काल लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांचे हे कृत्य समर्थनीय नसल्याचे शेट्टी म्हणाले आहेत. गृहमंत्र्यांनी याबाबतचा खुलासा केला पाहिजे.

प्रचंड उन असताना महिला, पुरूष आणि शेतकऱ्यांना बेशुध्द होईपर्यंत मारहाण केली आहे. लाठीचार्जमधील जखमी आणि बेशुध्द आंदोलकांवर उपचार न करता त्यांना तसेच रामभरोसे सोडून देण्यात आले. ही गोष्ट अतिशय लांच्छनास्पद आणि संतापजनक असल्याचे शेट्टी म्हणाले.

राज्य सरकारला सल्ला देतान शेट्टी म्हणाले की, तुम्ही आगीशी खेळू नका. अजूनही वेळ गेलेली नीही. शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना नको असेल, तर आम्ही हा रिफायनरी प्रकल्प आम्ही लादणार नाही, अशी घोषणा करा. आज जे आंदोलन करत आहेत, तेच तुमचा जयजयकार करतील, असेही शेट्टी म्हणाले.

दरम्यान, बारसू रिफायनरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिक बारसू रिफायनरीला विरोध करत सर्वेक्षण रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु, सरकार पोलिसांच्या आडून स्थानिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आहे. त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहे. त्यामुळे बारसू परिसरातील वातावरण तापले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT