Onion Traders Nashik agrowon
ताज्या बातम्या

Onion Traders Nashik : कांदा व्यापारी आपल्या भूमिकेवर ठामच, दादा भुसेंसोबतची बैठक निष्फळ

Onion auction : कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

sandeep Shirguppe

Onion auction News : कालपासून नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. यामुळे बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव जवळपास ठप्प झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात सध्या प्रतिदिन एक लाख क्विंटलचे लिलाव होतात.

व्यापाऱ्यांच्या पवित्र्यामुळे प्रतिदिन २० ते २५ कोटींची उलाढाल थंडावली आहे. दरम्यान याबाबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक बोलवण्यात आली होती. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादाजी भुसे यांची व्यापारी आणि विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली.

व्यापारी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याच्या मुद्यावर ठाम असल्याने उद्या दुपारी पुन्हा तीन वाजता येवल्यात व्यापाऱ्यांची बैठक होणार आहे. यामध्ये पुढचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांनी कांदा व्यापाऱ्यांसोबत तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. या बैठकील जिल्हाधिकारी आणि उपनिबंधकही उपस्थित होते. यावेळी व्यापारी आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही.

तुम्ही कोणत्या शेतकऱ्यांकडून किती कांदा खरेदी केला ? याची माहिती पुढील एक तासात जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करा तसेच रोजच्या व्यवहारांची माहिती देणे गरजेचे असल्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी या बैठकीत नाफेड आणि NCCF च्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

२६ सप्टेंबरच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी बाजू मांडावी, तोपर्यंत लिलाव सुरु करावेत कांदा व्यापाऱ्यांचे बरेचसे निर्णय सरकारी पातळीवरचे धोरणात्मक निर्णय आहेत. त्यावर इथे निर्णय होवू शकणार नाही. पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी २६ सप्टेंबरला याबाबत बैठक बोलावली आहे.

तिथे व्यापाऱ्यांनी आपली बाजू मांडावी, तोपर्यंत लिलाव सुरू करावेत असे आवाहन मंत्री दादाजी भुसे यांनी व्यापाऱ्यांना केले. गणेशोत्सव काळात कांदा लिलाव बंद ठेऊ नये, कारण यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचे भुसे म्हणाले. परंतु व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने कांदा लिलाव उद्याही होण्याची शक्यता कमी आहे.

अब्दुल सत्तारांचा व्यापाऱ्यांना इशारा

यावर पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यापाऱ्यांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले की, विविध कारणे देऊन व्यापारी लिलाव बंद ठेवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. त्यामुळे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. सत्तार येवला येथे एका खासगी कार्यक्रमास आले होते.

सध्या राज्यात गणपती आगमनाने सणासुदीचा काळ आहे. या काळात लिलाव बंद ठेवणे अयोग्य आहे. जे व्यापारी लिलाव बंद ठेवतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे आदेश आपण पणन आयुक्त व नाशिक जिल्हाधिकारी यांना दिले असल्याचे यावेळी सत्तार यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT