Sugar Production
Sugar Production Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Production : सातारा जिल्ह्यात एक कोटी क्विंटल साखर तयार

विकास जाधव 

Satara News : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली. १५ कारखान्यांकडून ९७ लाख ३२ हजार ४४५ टन उसाचे गाळप झाले. त्यातून एक कोटी सहा हजार ८८० क्विंटल साखरनिर्मिती झाली असून, सरासरी १०.३३ टक्के उतारा मिळाला आहे. सहकारी कारखान्यांनी साखर उताऱ्यात, तर खासगी कारखान्याने गाळप व साखरनिर्मितीत आघाडी ठेवली आहे.

जिल्ह्यातील आठ सहकारी व सात खासगी कारखान्यांनी ऊसगाळप केले आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी साखर कारखान्यांची संख्या वाढली आहे. अजिंक्यतारा साखर कारखान्यांचा अपवाद वगळता मार्चअखेर सर्वच कारखान्यांचा हंगामाची सांगता झाली होती.

जिल्ह्यात जरंडेश्‍वर कारखान्याने सर्वाधिक १६ लाख २७ हजार ३० मेट्रिक टन इतके सर्वाधिक गाळप केले असून, १६ लाख ४१ हजार ८०० क्विंटल साखरनिर्मिती जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. साखर उताऱ्यास सह्याद्री कारखान्याची आघाडी असून, या कारखान्यास सरासरी १२.०७ टक्के घेतली. गतवर्षी प्रमाणे याही हंगामात अजिंक्‍यतारा साखर कारखान्यांची उशिरा हंगामाची सांगता झाली आहे.

उताऱ्यात सहकारी व गाळपात खासगी कारखाने आघाडीवर

या हंगामात खासगी कारखान्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मोठ्या प्रमाणात गाळप केले. या सात खासगी कारखान्यांनी ५३ लाख ७० हजार ५४८ टन उसाचे गाळप केले आहे. त्याद्वारे ५० लाख ३१ हजार ६३५ क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. मात्र खासगी कारखान्यांचा साखर उताऱ्यात घट झाली आहे. खासगी कारखान्यांचा सरासरी ९.३७ टक्के साखर उतारा मिळाला आहे.

याउलट सहकारी कारखान्यांची परिस्थिती आहे. सहकारी साखर कारखान्यांनी ४३ लाख ६१ हजार ८९७ टन उसाचे गाळप करत ५० लाख २९ हजार २४५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. तर सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.५२ टक्के साखर उतारा मिळाला आहे. सहकारी कारखान्यांनी कमी गाळप करत जवळपास खासगी कारखाने इतकीच साखर निर्मिती केली आहे.

साखरेच्या उत्पादनात घट

गतवर्षी एक कोटी १४ लाख ८६ हजार ९८८ टन ऊस गाळप करत एक कोटी २५ लाख ६८ हजार ९३० क्विंटल साखर निर्मिती केली होती. या हंगामात मात्र गाळप व साखर निर्मितीत घट झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १७ लाख टन कमी गाळप व २५ लाख क्विंटल कमी साखर निर्मिती झाली आहे.

गळीत हंगाम दृष्टिक्षेपात

 सह्याद्री कारखान्यांचा सर्वाधिक १२.०७ टक्के साखर उतारा

 सहकारी साखर कारखान्यांचा सरासरी ११.५२ टक्के साखर उतारा

 जरंडेश्‍वर कारखान्याला सर्वाधिक गाळप व साखरनिर्मिती

 खासगी कारखान्यांकडूनही मोठ्या प्रमाणात गाळप

 एक कोटी क्विंटलभर साखरनिर्मितीची पंरपरा कायम

 गतवर्षीच्या तुलनेत २५ लाख क्विंटल कमी साखरेचे उत्पादन

पाच महिने चालला हंगाम

जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे गाळप ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहात किंवा नोव्हेंबर महिन्यांच्या सुरवातीस सुरू झाले होते. दुष्काळी तालुक्‍यांसह सर्वत्र ऊस लागवड झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गाळपास उपलब्ध झाला. कारखान्यांची संख्या वाढली असल्याने कमी कालवधीत मोठ्या प्रमाणात गाळप झाले आहे. त्यामुळे पाच महिने गाळप हंगाम चालल्याने साखर निर्मितीत कोटीची उड्डाणे कायम राहिली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT