Jayakwadi Dam Agrowon
ताज्या बातम्या

Jayakwadi Dam : जायकवाडी धरण भरले

टीम ॲग्रोवन

पैठण, जि. औरंगाबाद : मराठवाड्यासाठी वरदान ठरणारा जायकवाडी (Jayakwadi Dam) (नाथसागर) प्रकल्प १०० टक्के भरला आहे. त्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्यासह औद्योगिक वसाहतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न मिटला आहे.

यंदा २५ जुलैपासून जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात धरणाच्या वक्रदरवाजामधून विसर्ग सोडण्यात आलेला आहे. आतापर्यंत ४ हजार ६९१.०६२८ दलघमी, अर्थात १६५ टीएमसी पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडला आहे.

सध्या प्रकल्पात १०२ टीएमसी पाणीसाठा आहे. या वर्षी एकूण पाण्याची आवक २२१.३५ टीएमसी आहे. सध्या प्रकल्पात जिवंत पाणीसाठा ७६, तर मृत पाणीसाठा २६ टीएमसी आहे. प्रकल्पात एकूण १०२ टीएमसी पाणीसाठा आहे.

गेल्या चार वर्षांपासून जायकवाडी नाथसागर सतत भरत असल्याने आपत्ती व्यवस्थापन व पूरनियंत्राचे काम वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभक्षेत्र विकास औरंगाबादचे मुख्य अभियंता बी. के. गवळी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागागीय अभियंता अशोक चव्हाण, उपविभागागीय अभियंता ज्ञानदेव शिरसाट, धरण अभियंता विजय काकडे आदींनी व्यवस्थित हाताळले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

Crop Protection : पीक संरक्षणासाठी बीजप्रक्रिया महत्त्वाची

Hasan Mushrif : 'शक्तीपीठ' महामार्ग बाधित शेतकरी आक्रमक, मुश्रीफ यांच्या वाहनांचा ताफा अडविला

SCROLL FOR NEXT