Agriculture News  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Business : शेतीपूरक व्यवसायातून उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य

Farmer News Maharashtra : मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्यातर्फे रविवारी (ता. १७) कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये आयोजित रब्बी पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

Team Agrowon

Parbhani News : दुष्काळी परिस्थितीत दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्यपालन व्यवसायातून शेतीतील उत्पन्नाची जोखीम कमी करणे शक्य आहे. या व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी, पशुपालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तत्पर आहोत, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्‍ट्र पशू आणि मत्‍स्‍य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांनी केले.

मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्यातर्फे रविवारी (ता. १७) कृषी महाविद्यालयाच्‍या सभागृहामध्ये आयोजित रब्बी पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. इंद्र मणी होते. माजी खासदार सुरेश जाधव, शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. पाटील म्हणाले, की दूध उत्पादन वाढीसाठी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुग्ध प्रक्रिया उत्पादनातून अधिक फायदा होऊ शकतो. शेततळ्यातील मत्स्यपालन फायदेशीर ठरते. राजस्थानसारख्या कमी पाऊस पडणाऱ्या राज्यात झिंगेपालन केले जात आहे. केवळ पशुपालन हा शेतीपूरक नव्हे, तर मुख्य व्यवसाय होऊ शकतो.

डॉ. इंद्र मणी म्हणाले, की केंद्र शासनाच्या सहकार्याने डिसेंबर महिन्यात परभणी येथे क्षेत्रीय शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यांतील शेतकरी सहभागी होतील.

छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय सीड काँग्रेसचे आयोजन करण्यात येणार आहे. परभणी कृषी विद्यापीठाला १०५ वर्षांची कृषी संशोधनाची परंपरा आहे. तालुका स्तरीय हवामान व पीक नियोजन सल्ला देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीजोत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. दोन हजार एकरांवर पैदासकार बियाणे उत्पादन घेतले जात आहे. शेतकऱ्यांना सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

जाधव म्हणाले, की बदलत्या हवामान स्थितीत शेतकरी तग धरून राहावा यासाठी कृषी विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा. या परिसंवादात रब्बी पीक लागवड, कीड-रोग व्‍यवस्‍थापन आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते रब्बी पिकांच्या बियाणे विक्रीस प्रारंभ करण्यात आला. शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief Package: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी आल्यास...; बावनकुळे असे का म्हणाले?

Farmer Relief : आमदार पवारांकडून बाराशे अतिवृष्टिग्रस्तांना सव्वा कोटी मदत

Farmers Protest: बीडमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक! चुकीचे पंचनामे आणि तुटपुंज्या मदतीविरोधात किसान सभा आंदोलन पुकारणार

Farmer Relief : पीकविमा न भरलेल्यानांही भरपाई देण्याचे प्रयत्न

Bacchu Kadu: कर्जमाफी, नुकसान मदतीसाठी सरकार अपयशी; बच्चू कडू यांची सरकारवर टीका

SCROLL FOR NEXT