Crop Damage  Agrowon
ताज्या बातम्या

Tapi Flood : तापीच्या महापुरात चार हजार हेक्टरवर पिकांची अतोनात हानी

Latest Agriculture News : तापीला दोन दिवस मोठा पूर होता. यात जिल्ह्यातील रावेर, जळगाव, चोपडा भागातील केळी, कापसाच्या शेतीला मोठा फटका बसला असून, कोट्यवधींची हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : तापीला दोन दिवस मोठा पूर होता. यात जिल्ह्यातील रावेर, जळगाव, चोपडा भागातील केळी, कापसाच्या शेतीला मोठा फटका बसला असून, कोट्यवधींची हानी झाली आहे. चार तालुक्यांत चार हजार हेक्टरवरील केळी, कापसाचे पुराच्या पाण्याने नुकसान झाले आहे. रावेर तालुक्यातील २१ गावांत हानी झाली. त्यात भुसावळ नजीकच्या तापी नदीवरील हतनूर धरणाचे बॅकवॉटर शेतशिवारात शिरले.

यात रावेराती ऐनपूर, विटवा, निंबोल आदी गावांतील केळीचे नुकसान झाले आहे. पुढे जळगाव तालुक्यातील कठोरा, भादली, पळसोद, जामोद, रामेश्वर भागातही नदीकाठच्या शिवारात पुराचे पाणी शिरले. चोपडा तालुक्यात वटकार, वडगाव भागातही पुराचे पाणी शिवारात आल्याने कापूस, केळी पिकाची हानी झाली आहे. पुराचे पाणी ओसरले आहे.

पण त्यात मोठी हानी झाली. रावेर तालुक्यात केळी पिकाची सुमारे तीन हजार हेक्टरवर हानी झाली आहे. चोपडा, जळगाव व इतर भागात मिळून एक हजार हेक्टरवरील पिकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे.

लहान व मोठ्या केळी बागा अक्षरशः ऐनपूर, निंबोल भागात पाण्यात बुडाल्या होत्या. वडगाव, सुटकार भागातही पिके पाण्याखाली गेली होती. कापूस पिकात पाण्यामुळे अधिकची हानी झाली आहे. पुराचे पाणी अजूनही शेतात साचले आहे. त्याचा निचरा झालेला नाही. ऊन पडल्यानंतर चार ते पाच दिवसांत पिकातून पाणी नाहीसे होईल. यादरम्यान हानी ७० ते ८० टक्के होईल. यामुळे प्रशाासनाने १०० टक्के पिकहानी पुराचे पाणी शिरलेल्या शिवारासंबंधी शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणीदेखील केली जात आहे.

पळसोद येथील रामेश्वर मंदिरालादेखील तापी नदीच्या पाण्याचा वेढा पडला. या नुकसानीसंबंधी प्रशासन तातडीने ई-पंचनामे करणार आहे. यानंतर नुकसानीचा अंदाज काढून भरपाईसंबंधी कार्यवाही केली जाईल. नुकसानीसंबंधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रावेर व इतर भागात पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून मदतीसंबंधी कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.

पुलाच्या भरावास धक्का

पावसामुळे तापी नदीवरील सारंगखेडा (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील बॅरेजनजीकच्या टाकरखेडा - सारंगखेडा पुलानजीकचा भराव काहीसा खचला आहे. मोठे भगदाड पुलानजीक पडल्याने रविवारी (ता. १७) या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. हा पूल बंद झाल्याने वाहतूक प्रकाशा (ता. शहादा) मार्गे वळविण्यात आली. पुलाचा भराव तातडीने व्यवस्थित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharati Mata Bachav Campaign: लातूरला धरती माता बचाव निगरणी समितीची स्थापना

Fund Utilisation Issue: ग्रामपंचायत विभागावर विभागीय आयुक्तांची नाराजी

Banana Crop Management: आंबोड्यात केळी पीक व्यवस्थापन शेतीशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Revenue Village Status: जालना जिल्ह्यातील ४९ महसुली गावे घोषित करण्यावर चर्चा

Rabi Season: मोहोळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात

SCROLL FOR NEXT