Wardha News: ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी सलग्न हजारो हेक्टरमधील जंगलरानात शेकडो वन्यजीव कळपाच्या वास्तव्याने मानव वन्य जीवांमध्ये संघर्ष वाढीस लागला आहे. या भागात सात ते आठ वाघांचे वास्तव्य असून पाळीव जनावरांवर हल्ले सुरूच आहे. गेल्या वर्षभरात वाघांच्या हल्ल्यात तब्बल १९८ पाळीव जनावर ठार झाल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली. .समुद्रपूर तालुक्यातील गिरड, मंगरूळ, कोरा सहवन परीक्षेत्रातल्या गावशिवारातील परिस्थिती बघता भय इथले संपत नाही, अशी परिस्थिती आहे. केवळ जनावरांवर हल्ले नाही, तर हजारो हेक्टरमधील पिकांची नुकसानही या वन्य प्राण्यांकडून होते. परिणामी परिसरात कायम भीतीचे वास्तव्य आहे. वनविभागापुढे मानवी आणि वन्यजीव संघर्ष मालिका थांबविण्याचे मोठे आव्हान ठाकले आहे..Tiger Death Issue: राज्यातील ११० वाघांच्या मृत्यूंना मनुष्य जबाबदार.या आठवड्यात पिंपळगाव, लोखंडी, सुकळी, पेठ, धामणगाव आणि भावन्पूर शिवारात तब्बल नऊ जनावर वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. वर्षभऱ्यात गिरड सहवन परिक्षेत्रात ८२ , कोरा सहवन परिक्षेत्रात ३३, मंगरूळ सहवन परिक्षेत्रात ३० आणि समुद्रपूर सहवन क्षेत्रात ५३ असे एकूण १९८ जनावरावर वाघांनी हल्ले चढवून ठार केले. यात शेळी, बैल, वगार, कालवड अन्य प्राण्याचा समावेश आहे. दरवर्षीच्या तुलनेत वाघांच्या हल्ल्यात जनावर दुपटीने ठार झाली आहेत..तीन जिल्ह्यांचे जंगलक्षेत्रातून सीमांकनवर्धा, चंद्रपूर आणि नागपूर तीनही जिल्ह्याचे सीमांकन एकाच जंगल क्षेत्रातून झाले आहे. वनखात्यासाठी हद्दी कायम असल्या तरी वन्यजीवाला त्या मान्यच नाही. त्यांच्या सीमा ठरलेल्या नाही. त्यामुळे या जंगलातून त्या जंगलात वन्यजीव भ्रमंती करतात..Tiger Attack: मोहफुले वेचताना वाघाचा हल्ला; ५५ वर्षीय शेतकरी ठार.वाघांच्या संख्येबाबत अनिश्चितीगिरड -खुर्सापार जंगलात तब्बल पाच वाघ वास्तव्यास होते. त्यातील तीन पिलांना जेरबंद करण्यात आले. सध्या वाघ वाघिणीचे जोडपे या जंगलात कायम आहे. शिवणफळ, मोहगाव, पिंपळगाव, कोरा, मंगरूळ या भागांत स्वतंत्र भटकंती करणारे वाघ आढळून येत आहे. वनअधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात तब्बल सात वाघ वास्तव्यास आहेत..कायम स्वरूपी उपायाचे प्रयत्ननागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा करीत आमदार समीर कुणावार यांनी या भागातील जंगल क्षेत्र व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन राज्य शासनाकडे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाशी सलग्न जोडण्यासंदर्भात आणि गिरड जंगलाला पर्यटन दर्जा मिळवून देण्यसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी वनमंत्र्यांची भेट घेत शिवणफळ -ताडगाव जंगल ताडोबाशी सलग्न करण्याची मागणी केली आहे..जंगलालगतच्या शिवारात गुरे चारताना आणि रात्री गोठ्याजवळ वाघाचे वारंवार हल्ले होत आहेत. सध्या शेतशिवारात शेतमाल नसल्याने वाघांचा पाण्याच्या शोधात मुक्त संचार आहे. त्यामुळे वाघ गावाच्या शेजारी आढळून आल्याची घटना पिपरी शिवारात पुढे आली. यामुळे गावशिवारात वाघांचे वास्तव्य आढळून आल्यास नागरिकांनी वनविभागाला कळवावे. निश्चितच वन कर्मचारी आपल्या सहकार्यासाठी तत्पर आहे.नीलेश गावंडे, वन परिक्षेत्र अधिकारी , समुद्रपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.