Bharat Jodo Yatra Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : जल, जमीन, जंगलावर पहिला हक्क आदिवासींचा

‘‘या देशातील जल, जमीन आणि जंगलावर पहिला अधिकार हा आदिवासींचा अधिकार आहे.

Team Agrowon

जळगाव जामोद, जि. बुलडाणा ः ‘‘या देशातील जल, जमीन आणि जंगलावर पहिला अधिकार हा आदिवासींचा अधिकार (Tribal Right) आहे. सध्याचे केंद्र सरकार आदिवासींना आदिवासी संबोधत नाही तर वनवासी म्हणते. वनवासी आणि आदिवासी या दोन शब्दांमध्ये फरक आहे,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले.

भारत जोडो यात्रेअंतर्गत त्यांनी रविवारी (ता.२०) बुलडाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आदिवासी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

गांधी म्हणाले, ‘‘या देशातील जंगल झपाट्याने नाश पावत आहे. पंतप्रधान ही जंगले नष्ट करून ती जागा उद्योगपतींना उद्योग उभारण्यासाठी देत आहेत. काँग्रेस आणि मी सदैव आदिवासींसाठी लढा देत राहू. लहानपणी आजी इंदिरा गांधींनी सांगितले होते की, आदिवासी हे देशाचे खरे मालक आहेत. आजींनी दिलेले पुस्तक वाचल्यानंतर मी आदिवासी संस्कृतीचा अभ्यास केला. आदिवासी या देशाचे खरे मालक आहेत. आदिवासींसाठी काँग्रेस पक्ष सदैव संघर्षरत आहे,’’ असेही ते म्हणाले.

यात्रा दोन दिवसांसाठी स्थगित

भारत जोडो यात्रा महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या सीमेवर सध्या मुक्कामी आहे. राहुल गांधी गुजरातमध्ये दोन दिवस प्रचारासाठी गेल्याने ही यात्रा २३ नोव्हेंबरपासून पूर्ववत सुरू होऊन मध्य प्रदेशात दाखल होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cooperative Institute : सभासदांना १८ टक्के लाभांश देणार ः ठोंबरे

Rain Crop Damage : शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा गेल्या ‘पाण्यात’

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

SCROLL FOR NEXT