Farmer Death Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Death : अमृत काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश

Team Agrowon

Mumbai News : ‘‘देशात अमृत काळ साजरा केला जात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या वेगाने होत आहेत, हे सरकारचे अपयश आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

‘‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या अधिकच वाढत चालल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. यावरून पाटील यांनी सरकारला धारेवर धरत ट्विट केले आहे. ‘या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना आपले जीवन संपविणे सोपे वाटले हेच सरकारचे अपयश आहे,’’ अशी टीका त्यांनी केली.

‘‘शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरणी केली. मात्र अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेली. हाता तोंडाशी आलेले पीक जमीनदोस्त झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांना आपले जीवन संपविणे सोपे वाटले, हे सरकारचे खरे अपयश आहे,’’ असेही पाटील म्हणाले.

‘शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करा’

‘‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत पाटील यांनी राज्यभरामध्ये दीड हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद करत म्हटले आहे की, गेल्या नऊ महिन्यांमध्ये विदर्भात १ हजार ५८४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचे समोर आली आहे.

गेल्या २५ वर्षांतील ही सर्वाधिक संख्या आहे. देश अमृतकाळ साजरा करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी मात्र विष पिऊन आत्महत्या करत आहे. शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT