Hunger Strike
Hunger Strike Agrowon
ताज्या बातम्या

Hunger Strike : राज्यभरात किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

Team Agrowon

Pune News शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) थांबाव्यात यासाठी किसानपुत्र आंदोलनाच्या (Kisanputra Agitation) वतीने जाहीर करण्यात आलेल्या बळीराजासाठी अन्नत्याग (Hunger Strike) आंदोलन रविवारी (ता. १९) राज्याच्या विविध गावांत झाले.

गावातील शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत एक दिवस उपवास करत अन्नत्याग आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाच्या निमित्ताने किनगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथून निघालेल्या पदयात्रेचा समारोप धुळ्यात जेल मैदान येथे सभेने झाला.

या सभेत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे (अकोला) शेतकरी संघटनेचे नेते विनय हार्डीकर (पुणे) किसानपुत्र आंदोलनाचे कार्यकर्ते अमर हबीब (अंबाजोगाई) यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी शेतकरी नेत्यांनी सरकारच्या शेती आणि शेतकरी विरोधी धोरणे आणि कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप केला.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजारभाव मिळत नाहीत. कापूस, सोयाबीन, कांदा, हरभरा आदी पिकांना केवळ सरकारी हस्तक्षेपामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

अन्नत्याग आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना अमर हबीब म्हणाले, ‘‘३७ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी १९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे (रा. चिलगव्हाण, जि. यवतमाळ) यांनी नापिकीला कंटाळून आणि कर्जबाजारीपणामुळे कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या केली होती.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे ही आत्महत्या झाल्याची पहिली नोंद होती. यामुळे आजचा दिवस अन्नत्याग आंदोलन केले जाते. किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार २०१७ पासून लाखो लोक १९ मार्चला अन्नत्याग (उपवास) करत आहेत.

या ठिकाणी झाले अन्नत्याग आंदोलन

अमरावती येथे पंचवटी चौकात राष्ट्रीय ओबीसी किसान संघाच्या वतीने, वाशीम जिल्ह्यात भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने वरुड, मोर्शी, वाटोर, पापड येथे, नागपूर, काटोल, उमठा, सावनेर, मूर्तिजापूर, आकोट आदी ठिकाणी उपोषण करण्यात आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर येथील क्रांती चौकात दिवसभर उपोषण करण्यात आले.

अंबाजोगाई, धारूर, दिंद्रुड, घटनांदूर, परभणी जिल्ह्यातील दैठणा, जालना जिल्ह्यातील परतूर, वाढोना, जवळाबाजार, साटंबा व लातूर जिल्ह्यातील पानगाव, उदगीर आदी ठिकाणी शेतकरी उपोषणाला बसले होते. तर कोल्हापूर जिल्ह्यात जय किसान भेटकरी संघटनेच्या वतीने पेठ वडगाव येथे, नाशिक जिल्ह्यात मुंगसरे, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव व पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर येथेही उपोषण करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT