Agriculture Electricity
Agriculture Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Electricity : वीजप्रश्‍नी शेवगावला शेतकरी आक्रमक

Team Agrowon

नगर : गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी (Heavy Rain) व महापुराच्या (Flood Crisis) संकटाचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणच्या (Mahavitaran) हलगर्जी कारभाराचा फटका बसला आहे. जास्त पावसाने खरीप हंगाम (Kharif Season) वाया गेला असतानाच खरडगाव वीज उपकेंद्रांतील आठ गावांत दुरुस्तीची अपूर्ण कामे व खंडित वीजपुरवठ्यामुळे (Power Supply) रब्बी हंगामदेखील (Rabi Season) धोक्यात सापडला. या बाबत वरूर येथील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी केली आहे.

खरडगावच्या ३३ केव्ही उपकेंद्रातील गावे गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टी व महापुराच्या संकटाचा सामना करत आहेत. जास्त पावसाने खरिपातील बहुतांश पिके वाया गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. गहू, हरभरा, ज्वारी, तूर, कपाशी, कांदा, ऊस या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. मात्र गेल्या पाच ते सात महिन्यांपासून खरडगाव वीज उपकेंद्राच्या रोहित्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत.

मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी अभियंत्यांना दिले. वरील बाब वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या वारंवार निदर्शनास आणली. परंतु त्याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यासाठी आठ गावांतील रब्बी हंगामाच्या उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या चार-सहा दिवसांत पुरेसा वीजपुरवठा झाला नाही, तर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT