CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Eknath Shinde : शेतकऱ्यांसह जनता सुखी व्हावी, यासाठीच सरकारचे प्रयत्न: मुख्यमंत्री

Team Agrowon

नाशिक : हवामान बदल (Climate Change), दुष्काळ (Drought), अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यासाठी शासनाने एनडीआरएफची शिफारस डावलून अधिक मदत केली आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्या ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांना मदत केली आहे. शेतकऱ्यांसह राज्यातील जनता सुखी व्हावी, यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.

हे सरकार केवळ सत्तेवर बसलेल्या एका राजकीय पक्षाचे नाही तर राज्यातील प्रत्येक जनतेचे आहे. शेतकरी व जनतेला पायाभूत सुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी सरकारचा नेहमीच प्रयत्न राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.

नाशिकमध्ये झालेल्या श्री समर्थ सेवा मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, चंद्रकांत मोरे, आबासाहेब मोरे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बबन लोणीकर, संजय शिरसाट, भरत गोगावले, सुहास कांदे, सीमा हिरे आदी उपस्थित होते.

शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या हाती अधिक पैसा येईल. यादृष्टीने सरकारसह समर्थ मार्गासारख्या अनेक माध्यमातून मार्गदर्शन मिळाल्यास शेतकरी अधिक सुखी होईल.

गुरुमाऊली मोरे यांनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करीत, असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT