Nashik News जिल्ह्यात गत पंधरवड्यापासून वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे (Hailstorm) ३८ हजार हेक्टरवर दाणादाण उडाली आहे. त्यामुळे जवळपास ६७ हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे.
गुरुवारी (ता. २०) दुपारनंतर पुन्हा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे परिसरात हलका पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे कांद्यासह भाजीपाला पिकांना फटका बसला आहे.
नांदूर-शिंगोटे परिसरात चास, दोडी, दापूर, मानोरी परिसरात या पावसाने दणका दिला. शेतात कांद्याच्या पोळी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
काही शेतकऱ्यांनी ताडपत्री टाकून कांदा झाकल्याने संभाव्य नुकसान टळले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा झाकून ठेवता आला नाही. त्यामुळे कांदा भिजल्याने नुकसान झाले.
भाजीपाला पिकांना गारपिटीचा फटका
चास परिसरात प्रामुख्याने भाजीपाला पिकांमध्ये टोमॅटो, विदेशी भाजीपाला, कोबी, फ्लॉवर या पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र गारपिटीने या पिकांना फटका बसला आहे. गारांच्या तडाख्यात भाजीपाला पिकांची पाने फाटली व फूलगळ झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.