Onion
Onion  Agrowon
ताज्या बातम्या

Onion : कांद्राप्रश्‍नी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा

टीम ॲग्रोवन

नाशिक : ‘‘नाफेड’ने कांदा विक्री (NAFRD Onion Sale) बंद करून खरेदी सुरू करावी, जेणेकरून त्यात स्थिरता येईल. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion Producer Farmer) दिलासा द्यावा,’’ अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांच्याकडे केली.

शेट्टी यांनी दिलेल्या पत्रानुसार, देशातील सर्वाधिक कांदा हा बांगलादेश आणि श्रीलंकामध्ये निर्यात होत होता. विशेषतः: बांगलादेश भारताच्या एकूण कांद्याच्या निर्यातीच्या ६० टक्के कांदा खरेदी करत होता. परंतु केंद्र सरकारचे आयात-निर्यातीचे लहरी धोरण, अचानक निर्यात बंदी लावणे यासारख्या प्रकारास कंटाळून बांगलादेशने भारतीय कांद्याच्या आयातीस वेगवेगळे निर्बंध लावून भारताचा कांदा आयात होणार नाही, याची दक्षता घेतली.

इराककडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला. आपण एक हक्काची बाजारपेठ गमावून बसलो आहोत. श्रीलंकेतील अंतर्गत यादवीमुळे तिथेही निर्यात बंद आहे. तशातच नाफेडने कांदा खरेदी बंद करून आपलाच खरेदी केलेला कांदा स्थानिक बाजारात विकायला सुरू केली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव धडाधड कोसळत आहेत.

बांगलादेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अडथळे आणावेत

केंद्र सरकारने आता खडबडून झोपेतून जागे व्हावे आणि नाफेडचा कांदा विक्री बंद करून कांदा खरेदी सुरू करावी. अजून अडीच लाख टन कांदा खरेदी करावा. बांगलादेश जर आमचा कांदा घेणार नसेल तर तेथून आयात होणाऱ्या कापड आणि तयार कपड्यांच्या आयातीत अडथळे निर्माण करावेत. तरच कांदा उत्पादकांना न्याय मिळेल, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT