Dilip Walse Patil Agrowon
ताज्या बातम्या

Strawberry Farming : भीमाशंकर परिसरात स्ट्रॉबेरी क्षेत्र वाढीसाठी लक्ष द्यावे

Strawberry Cultivation : आंबेगावचा पश्‍चिम घाट परिसर हा निसर्गसंपन्न असून, याठिकाणचे हवामान स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.

Team Agrowon

Pune News : ‘‘भीमाशंकर आणि परिसरातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी हे प्रभावी पीक ठरत आहे. या पिकातून आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार असल्याने हे पीक उत्पादन आणि क्षेत्र वाढीसाठी कृषी विभागाने विशेष लक्ष द्यावे,’’ अशा सूचना राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केल्या आहेत.

घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील पंचायत समिती सभागृहात खरीप हंगाम नियोजन व आढावा बैठक दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी वळसे पाटील म्हणाले, ‘‘आंबेगावचा पश्‍चिम घाट परिसर हा निसर्गसंपन्न असून, याठिकाणचे हवामान स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक असल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे.

या परिसरात स्ट्रॉबेरी पिकाचे क्षेत्र आणि उत्पादन वाढले तर चांगले पर्यायी पीक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या पिकाच्या प्रोत्साहनासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत.

यासाठी आवश्‍यक माती परीक्षणासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माती परीक्षण प्रयोग शाळेचा वापर करा. तसेच रांजणगाव येथे असलेली वेफर्सची कंपनी बंद होत असल्याचे समजते. या कंपनीने बटाटा खरेदी कमी केली आहे.

कंपनीने बटाटा खरेदी केली नाही तर सातगाव पठारावरील शेतकऱ्यांचे उत्पन्न मिळणार नाही. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही कंपनी सुरू राहणे आवश्‍यक आहे.

यासाठी कंपनी व्यवस्थापनसोबत लवकर चर्चा करू. पुढील वर्षीपासून तालुक्यात आदिवासी भागात व पूर्व भागात असे दोन मिळावे घेण्यात यावेत. यावर्षी पाऊस कमी पडेल असे शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे.

सध्या बहुतांश धरणांतील पाणी कमी झाले आहे. पाऊस जर लांबला तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. याला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे,’’ अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

तसेच, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील हापूस आंब्याचा दर्जा वेगळा आहे. या आंब्याला मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत मोठा ग्राहकवर्ग आहे.

त्यामुळे आंब्याच्या लागवडीसाठी विविध योजना बांधापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने अभियान राबवावे.

खरिपात खताची टंचाई, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने अलर्ट राहावे, अशा सूचना वळसे पाटील यांनी दिल्या.

दरम्यान, सभेमध्ये पीक स्पर्धेमध्ये उच्चांकी उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी संजय काचोळे, तालुका कृषी अधिकारी टी. के. चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, रूपाताई जगदाळे, संजय गवारी, संतोष भोर, उषाताई कानडे, शिरीष भारती, मनोज कोल्हे, नायब तहसीलदार एन. आर. गवारी, महेश मोरे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमिला मडके यांनी केले, तर आभार अर्चना कोल्हे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी

Soybean Farmers Protest: हमीभावासाठी किसान मोर्चाचे लातूर बाजार समितीसमोर धरणे

Rabi Crop Insurance: रब्बी पीकविम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

Natural Sugar Factory: शेतकऱ्यांना ‘एआय’चा फायदा देणारा ‘नॅचरल’ राज्यातील पहिला कारखाना: राजकुमार मोरे

Climate Change: बदलत्या हवामानास अनुकूल वाणांच्या निर्मितीची गरज

SCROLL FOR NEXT