Assam Flood  Agrowon
ताज्या बातम्या

Assam Flood : आसाममधील पुराचा ३१ हजार जणांना फटका

Assam Rain Update : मुसळधार पावसामुळे आसाममधील बहुतांश जिल्ह्यात पूर आला आहे. सुमारे १० जिल्ह्यांत ३१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना फटका बसला आहे.

Team Agrowon

Assam Rain Update : मुसळधार पावसामुळे आसाममधील बहुतांश जिल्ह्यात पूर आला आहे. सुमारे १० जिल्ह्यांत ३१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांना फटका बसला आहे. अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या राज्यातील ४४४ खेडी पाण्याखाली असून राज्यात ४७४१.२३ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. येत्या पाच दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गुवाहाटीच्या आयएमडीच्या प्रादेशिक हवामान खात्याने राज्यात सोमवारपासूनच चोवीस तासांसाठी रेड ॲलर्ट जारी केला आहे. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज ॲलर्ट आणि गुरुवारसांठी येलो ॲलर्ट जारी केला आहे.

रेड ॲलर्टचा अर्थ तत्काळ कारवाई करणे, तर ऑरेंज ॲलर्टचा अर्थ कारवाईसाठी सज्ज राहा आणि येलो ॲलर्टचा अर्थ प्रत्येक क्षणी लोकांनी सजग राहणे. आसामच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या अहवालानुसार गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन कोलमडून पडले आहे.

चिरांग, डारंग, धेमाजी, दिब्रुगड, कोक्राझार, लखिमपूर, नलबारी, सोनीतपूर, उदलगुरी जिल्ह्यात पुरामुळे ३०,७०० पेक्षा अधिक नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. यात लखीमपूर जिल्ह्यातील २२ हजारापेक्षा अधिक नागरिकांना फटका बसला. तसेच दिब्रुगड येथे ३८०० अधिकपेक्षा नागरिक तर कोक्राझार येथे १८०० जणांना फटका बसला आहे.

असंख्य गावे पाण्याखाली

आसाम प्रशासनाने सात जिल्ह्यांत मदत केंद्र उभारले आहे. मात्र प्रशासनाकडून अद्याप मदत छावण्या उभारण्यात आलेल्या नाहीत. सध्या राज्यातील ४४४ खेड्यांत पाणी असून संपूर्ण राज्यात ४७४१.२३ हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.

विश्‍वनाथ, धुब्री, दिब्रुगड, गोलाघाट, कामरूप, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, माजुली, मोरीगॉंव, नॉगाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तमुलपूर आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भूस्खलन झाले आहे. दीमा हसाओ, कामरूप मेट्रोपॉलिटन आणि करीमगंज येथे पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.

रस्ते, पूल आणि अन्य पायाभूत सुविधांची मोठी हानी झाली आहे. पुरामुळे कछार, दारंग, जोरहाट, कामरुप, कोक्राझार, नलबारी जिल्ह्यात अनेक ठिकाणचा भाग पाण्याखाली गेला आहे कामपूर येथे ब्रह्मपूत्रची उपनदी कोपिलीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT