Bhor News : भोरच्या पश्चिम भागात वन्यप्राणी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कितीही युक्त्या केल्या तरी वन्यप्राणी पिकांत धुडगूस घालीत आहेत. भातासह इतर पिकांची नासधूस होत असल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. यामुळे वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
भोरचा पश्चिम भाग डोंगराळ भागात यंदा चांगल्या असलेल्या पिकांत वन्य प्राण्यांनी शिरकाव केल्याने मोठे नुकसान होत आहे. यात रानडुकरे, वानरे, माकडे, सांबर, भेखर, ससे व मोर प्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होत आहे. जुन्या साड्या व रंगीत कापडांचे कुंपण करणे, रात्रीची राखण करणे, भुजगावणे उभारणे, पत्राचे डबे -फटाके वाजवणे, बिसलेरी बाटलीत वाळू भरून तारेला बांधणे आदी वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवून शेतकरी आपल्या पिकाचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
मात्र, त्यातून ही रानटी प्राणी मोका शोधून शेतात शिरतात व शेताचे नुकसान करतात. त्यामुळे वनविभागाकडून काहीतरी भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी वनविभागाकडे अर्ज करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.