Sugar Factory Election : तनपुरे साखर कारखान्याची सत्ता कोणाकडे जाणार

Sugar Factory Election Ahilyanagar : राहूरी (जि. अहिल्यानगर) येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रयत्न करुनही बिनविरोध झाली नाही.
Sugar Factory Election
Sugar Factory ElectionAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके : अॅग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar : राहूरी (जि. अहिल्यानगर) येथील डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रयत्न करुनही बिनविरोध झाली नाही. २१ जागांसाठी ५६ उमेदवार रिंगणात असून तीन पॅनलमध्ये लढत होत आहे. यापूर्वी सत्ता असलेल्या भाजपने माघार घेतली असून आपली भूमिका गुलदस्तात ठेवली आहे. महत्वाची भूमिका बजावणाऱ्या शेतकरी संघटनेची भूमीकाही सध्यातरी शांत दिसत आहे. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या कारखान्यावर कोणाची सत्ता येतेय याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

राहुरी तालुक्यासाठी वरदान असलेल्या डॉ. तनपुरे कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्यासाठी ३१ मे रोजी मतदान होत आहे. या कारखान्यावर बहुतांश काळ स्व. रामदास पाटील धुमाळ तसेच तनपुरे यांची सत्ता राहिलेली आहे. या वेळी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूकही बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रयत्न फोल ठरले. बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल आहे.

अरुण तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत. राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनेल आहे. कारखान्याचे माजी अध्यक्ष व कारखान्याची बऱ्याच काळ सत्ता राहिलेले स्व. रामदास पाटील धुमाळ यांचे पुतणे व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमृत धुमाळ पाटील यांच्या पॅनेलचे १३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. एक अपक्ष उमेदवार आहे.

मागील वेळी माजी खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी कारखान्यावर सत्ता आली होती. या वेळी मात्र विखे, आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यासह भाजपशी संबंधित उमदेवारांनी अर्ज मागे घेतले आणि पाठिंबा देण्याबाबत अजूनही भूमिका स्पष्ट केली नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे हे निवडणुकीत उतरतील अशी शक्यता होती. मात्र ते आणि शेतकरी संघटना या निवडणुकीपासून अलिप्त असल्याचे दिसत आहे.

सत्ताधाऱ्यांना कसरत करावी लागणार

राज्यातील नावाजलेल्या सहकारी साखर कारखान्यात पूर्वी राहुरीतील स्व. बाबूराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याची गणना होई. मात्र अलीकडच्या काही वर्षांत कारखाना सतत अडचणीत येत आहे. मागील निवडणुकीनंतर कारखाना सुरू केला व पुन्हा बंद पडला. आर्थिक स्थिती बिघडल्याच्या कारणाने सध्या काही वर्षांपासून हा कारखाना बंदच आहे. त्यामुळे कारखान्यावर ज्यांची सत्ता येईल त्यांना पुन्हा हा कारखाना सुरू करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com