Nanded News : शेतकऱ्यांना संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी, यासाठी शेतात प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रयत्न केले जाईल. तसेच प्रयोगशाळा ते शेती या धोरणात बदल करून शेती ते प्रयोग शाळा आसे धोरण अवलंबिणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून एखादे पुस्तक लिहिण्याची गरज आहे, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी यांनी व्यक्त केले.
अर्धापूर तामसा रस्त्यावरील दिलीप निळेकर यांच्या शेतात सोमवारी (ता. ८) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ सोमवारी (ता. ८), के. फर्टस लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय हळद लागवड या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी जिल्हा कृषी अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेत्तीवार, कापूस संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. खजिर बेग, डॉ. धर्मराज गोखले, तालुका कृषी अधिकारी श्री. सोनकांबळे आदी उपस्थित होते. शिवार फेरीच्या माध्यमातून सेंद्रिय हळद, हरित खत, जैविक खते निर्मिती याविषयी चर्चा करण्यात आली. दुर्मीळ वाणाची जतन व संवर्धन, अर्धापुरी केळीची लागवड, मातीचे पोत राखणे, सेंद्रिय शेती या विषयावर चर्चा करण्यात आली.
डॉ. इंद्र मणी म्हणाले, की शेतातील पराटी, केळीचे कंद यापासून खत निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात येईल. रासायनिक खतांचा अति वापरामुळे जमिनीचा पोत बिघडला आहे. तो सुधारण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
कृषी विद्यापीठाने शेतकरी व विद्यार्थी केंद्रित धोरण अवलंबिले आहे. विषमुक्त शेती उत्पादने करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक के फर्ट लॅबाचे संचालक पेंढारकर यांनी केले. या वेळी कृष्णा देशमुख, मारोतराव देशमुख, ज्ञानेश्वर माटे, संदीप डाकुलगे, गोविंद राऊत, सुमेध देशमुख आदी उपस्थित होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.