Khandesh Water Storage : खानदेशात पाणी वापर वाढला

Water Crisis : खानदेशात जलसाठा मुबलक आहे. पण पाण्याचा उपयोग, मागणी वाढली आहे. काही प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याची स्थिती आहे.
Khandesh Water Stock
Water Storage Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात जलसाठा मुबलक आहे. पण पाण्याचा उपयोग, मागणी वाढली आहे. काही प्रकल्पांतील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याची स्थिती आहे. सध्या खानदेशात जलसाठा ७३ टक्क्यांवर आहे. गावोगावी पाण्याची मागणी आहे. टंचाई कमी आहे.

जळगावातील गिरणा, धुळ्यातील पांझरा व नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातील जलसाठ्यात या महिन्यात घट झाली आहे. कारण त्यातून रब्बीसह अन्य बाबींसाठी पाणी देण्यात आले आहे. हे सर्व प्रकल्प यंदा १०० टक्के भरले होते. यंदा डिसेंबरमध्येही एकूण जलसाठा खानदेशात ८५ टक्क्यांवर होता. खानदेशातील एकूण जलसाठा घटत आहे.

Khandesh Water Stock
Water Shortage : जतच्या पूर्व भागातील दहा गावांत जाणवणार पाणीटंचाई

गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिकमधील नांदगावात आहे. परंतु या प्रकल्पाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागांत अधिक आहे. २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बीचे सिंचन या प्रकल्पातील जलसाठ्याच्या मदतीने करता येत आहे. या प्रकल्पात जलसाठा फक्त १०० टक्के होता.

अधिक पावसाने गिरणा पट्ट्याला यंदा दिलासा मिळाला. चाळीसगावातील मन्याड प्रकल्पातही जलसाठा घटला आहे. पाचोऱ्यातील बहुळा, गिरणा पट्ट्यातील बहुळा, अग्नावती, भोकरबारी, पारोळ्यातील बोरी, एरंडोलातील अंजनी प्रकल्पातही पाण्याची मागणी असून, जलसाठा कमी झाल्याची माहिती आहे.

Khandesh Water Stock
Water Shortage : ओढे, बंधारे आटले; डोळे सिंचन योजनांकडे

गिरणा धरणातून रब्बीला पाणी देण्यात येत आहे. एक वेळेस नदीत टंचाई निवारणार्थ पाणी देण्यात आले आहे. तसेच उद्योगांसह चाळीसगाव, भडगाव व पाचोरा शहरास पिण्यासाठी त्यातून पाणी दिले जात आहे. यामुळे यातील जलसाठा कमी झाला आहे.

खानदेशात काही प्रकल्पांत जलसाठा कमी होता. पण कमाल प्रकल्प १०० टक्के भरले होते. त्यातून सर्वत्र पाण्याची मागणी आहे. पुढे उष्णता वाढणार असून, पाणीवापर आणखी अधिक राहील, असे दिसत आहे.

१०० टक्के भरलेले प्रकल्प होताहेत रिकामे

जळगाव जिल्ह्यात जामनेरातील तोंडापूर, वाघूर, रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील मोर, गारबर्डी, चोपड्यातील गूळ, भुसावळनजीकचा तापी नदीवरील हतनूर हे प्रकल्प १०० टक्के भरले होते. धुळ्यातील पांझरा व अनेर, नंदुरबारातील दरा व देहली हे मध्यम प्रकल्पदेखील १०० टक्के भरले होते. परंतु त्यातील जलसाठाही १५ ते १८ टक्के घटला आहे.

हतनूर प्रकल्पातून जळगावातील औद्योगिक वसाहत, भुसावळ शहर, भुसावळातील आयुध निर्माणी, दीपनगर औष्णिक वीजप्रकल्पास पाणीपुरवठा होतो. तसेच यावल, रावेर व चोपड्यातील रब्बीसही तीन वेळेस आवर्तन देण्यात आले आहे.

त्यातील जलसाठा ८० टक्क्यांखाली आहे. वाघूर प्रकल्पातूनही जळगाव शहर, जामनेर शहर, लहान उद्योग, जळगाव व भुसावळातील काही गावांतील रब्बीसही पाणी देण्यात आले आहे. यातील जलसाठाही ८० टक्क्यांखाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com