Water Scarcity : सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांत टँकरद्वारे पाणी

Water Shortage : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईत वाढ सुरू असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मागणीत वाढ होत आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Satara News : सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस टंचाईत वाढ सुरू असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात दोन लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यास टंचाईच्या झळा बसत असल्याने सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई भीषण होऊ लागली आहे. जिल्ह्यात तब्बल आठ तालुक्यांत १३२ गावे व ५४० वाड्यावस्त्यांवरील दोन लाख ४१ हजार १०४ लोकांना १४२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात टंचाईच्या झळा सर्वाधिक माण तालुक्यात जाणवत आहेत.

Water Scarcity
Water Shortage : देशातील निम्म्या जलाशयांत केवळ ४० टक्के पाणीसाठा

एकट्या माण तालुक्यात ५६ गावे व ३६५ वाड्यावस्त्यांवर ७३ टँकर सुरू असल्याने पाणीटंचाईची भीषणता दिसून येत आहे. अनेक विहिरी, बोअरवेल आटल्या असून, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता नसल्याने पिकांचेही नुकसान होणार आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे.

माण पाठोपाठ खटाव तालुक्यात टंचाईच्या झळा बसत आहे. खटाव तालुक्यात २६ टँकरद्वारे ३० गावे व १०६ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्यात २० टँकरद्वारे २२ गावांत पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात १६ टँकरद्वारे २० व ७२ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात तीन

Water Scarcity
Water Scarcity : चार टँकरवर २४३ गाव-वाडे

वाड्यावस्त्यांवर तीन टँकरद्वारे, वाई तालुक्यात दोन टँकरद्वारे दोन गाव व तीन वाड्यावस्त्यांवर, खंडाळा तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात, कऱ्हाड तालुक्यात एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तलावांसह विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. राज्यात परतीचा पाऊसही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे मार्च-एप्रिल महिन्यांत निर्माण होणारी परिस्थिती जानेवारीमध्ये दिसून येत आहे. या स्थितीमुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट आणखी गंभीर होऊ लागले आहे.

‘६८ विहिरी, बोअरवेलचे अधिग्रहण’

जिल्ह्यात पाणीटंचाईत वाढ होत असल्याने विहीर व बोअरवेलचे अधिग्रहणात वाढ केली जात आहे. संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ४० विहिरीचे व ४६ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com