
Purandar News : पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या माळशिरस वितरिकेवरील टेकवडे नजीक मुख्य वितरिकेचे यंत्र तुटल्याने पाणीपुरवठा रविवार (ता. १५) पासून बंद करण्यात आला. अनेक दिवसांपासून नादुरुस्त होऊन गळती होत असलेल्या या वितरिकेच्या पाणी नियंत्रण यंत्राच्या दुरुस्तीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने वितरिकेच्या शेवटच्या टोकातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
माळशिरस वितरिका वाघापूर येथील पंप हाऊस वरून टेलच्या पोंढे गावाकडे जात असताना मध्यवर्ती भागात असलेल्या टेकवडी गावाच्या पश्चिमेला मुख्य वितरिकेवरती असलेल्या यंत्रणेतील दोषामुळे (एअर वॉल्व्ह) अनेक दिवसांपासून पाण्याची गळती होत होती. मध्यंतरी काही यंत्रांची दुरुस्ती केली त्यावेळेसच याची देखील दुरुस्ती अधिकारी वर्गांकडून केली जाईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.
मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पाण्याच्या दाबाने येथील यंत्रणा नादुरूस्त होऊन, मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती. परिणामी उच्च दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने वितरण विस्कळीत झाले होते.
सहा महिन्यांनी सुरू झालेले पाणी बंद
योजनेच्या माळशिरस वितरिकेला टेलला असलेल्या पोंढे, मामावाडी, पाटील वस्ती, महाले वस्ती यांना मागील सहा महिन्यांपासून योजनेचे पाणी मिळालेले नाही. येथील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन करत, दोन दिवसांपूर्वी या भागात पाणीपुरवठा सुरू झाला होता. अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना पाणी गेलेले असताना आणखी आठ दिवस तरी या परिसरात पाणी चालणे गरजेचे असताना अचानकच वितरिकेवरील झालेल्या या अडचणीमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.