Water storage : खानदेशातील जलसाठा वाढला

Dam water level : खानदेशात मागील ८ ते १० दिवसांत झालेल्या पावसाने अनेक मध्यम व लघू प्रकल्पांतील जलसाठा वाढला आहे.
Dam
DamAgrowon
Published on
Updated on

Jalgoan News : खानदेशात मागील ८ ते १० दिवसांत झालेल्या पावसाने अनेक मध्यम व लघू प्रकल्पांतील जलसाठा वाढला आहे. पारोळा तालुक्यातील म्हसवे, कंकराज हे लघू प्रकल्प भरले आहेत. तसेच बोरी मध्यम प्रकल्पातील जलसाठाही चांगला वाढला आहे.

Dam
Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

नंदगाव (जि. नाशिक) जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील जलसाठा मागील १० दिवसांत दीड टक्क्याने वाढला आहे. गिरणा धरणाची साठवणक्षमता १८.५० टीएमसी आहे. हे धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यात आहे. पण त्याचा सर्वाधिक लाभ जळगावला आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या भागात धरणातून रब्बीसाठी पाणी दिले जाते. २१ हजार हेक्टरवरील रब्बीला त्याचा उपयोग होतो. सलग चार वर्षे हे धरण १०० टक्के भरले आहे. मागील वर्षी ऑगस्टमध्येच गिरणा धरण भरले होते. पण यंदा त्यात फक्त ५५ टक्के जलसाठा आहे. या धरणावर मनमाडसह चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि काही उद्योगांनाही पाणी दिले जाते. तसेच १०० गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो.

Dam
Crop Damage : जळगावात अतिवृष्टीने अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जामनेर (जि. जळगाव) तालुक्यातील वाघूर नदीवरील वाघूर धरणातील जलसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याची साठवण क्षमता ९.५० टीएमसी आहे. या धरणातून जळगाव शहर, जामनेर शहरासह काही गावे व औद्योगिक क्षेत्राला पाणी दिले जाते. त्यातील जलसाठा समाधानकारक असल्याने भुसावळ, जळगाव तालुक्यात रब्बीसही पाणी मिळणार आहे. सुमारे अडीच हजार हेक्टर क्षेत्राला या धरणातून रब्बीसाठी पाणी दिले जाईल.

तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूर धरणातून प्रकल्पातील आवक व जलसाठा नियंत्रण यासंबंधी विसर्ग सुरू आहे. या धरणाचे आठ दरवाजे उघडे आहेत. यातही १०० टक्के जलसाठा होईल. यामुळे रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील सुमारे १० हजार हेक्टरवरील रब्बी हंगामासह भुसावळ शहर, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक वीज प्रकल्पासही पाणी पुरेसे उपलब्ध होईल. जामनेरातील तोंडापूर मध्यम प्रकल्पातही १०० टक्के जलसाठा आहे. धुळ्यातील पांझरा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. पण बुराई, मालनगाव, अमरावती, सोनवद या प्रकल्पांत जलसाठा अल्प आहे. नंदुरबारातील दरा, देहली प्रकल्पातही १०० टक्के जलसाठा आहे.

सातपुडालगत आबादानी

खानदेशात सातपुडालगतचे प्रमुख प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यात रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी लघू प्रकल्प, मोर मध्यम प्रकल्प, चोपड्यातील गूळ लघू प्रकल्प, धुळ्यातील शिरपूरमधील अनेर मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. सातपुड्यातील प्रमुख नद्यांना प्रवाही पाणी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com