Water Stock : रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीसाठा १.६६ दलघमीने घटला

Water Storage : एका आठवड्यात बाष्पीभवनामुळे सुमारे १.६६ दलघमी पाणीसाठा घटल्याची स्थिती आहे.
Water Stock
Water StockAgrowon

Ratnagiri News : राज्यासह जिल्ह्यात पाणीटंचाईची भीषण स्थिती आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जिल्ह्यातील ४६ लघुपाटबंधारे धरणांमध्ये १११.४० दलघमी पाणीसाठा असून, तो एकूण ४७.१२ टक्के एवढाच आहे.

एका आठवड्यात बाष्पीभवनामुळे सुमारे १.६६ दलघमी पाणीसाठा घटल्याची स्थिती आहे. जिल्ह्यातील तिन्ही मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ३ मध्यम धरण प्रकल्प तर ४६ लघू पाटबंधारे धरण प्रकल्प आहेत.

Water Stock
Water Shortage : जळकोट तालुक्यात टंचाईची धग वाढली

त्यामध्ये मध्यम धरण प्रकल्पापैकी नातूवाडी धरणामध्ये शुक्रवारपर्यंत (ता.५) उपयुक्त पाणीसाठा ४५.७५ टक्के आहे. गडनदी प्रकल्पात ६६.२२ टक्के तर अर्जुना प्रकल्पामध्ये ८७.८८ टक्के असा चांगला पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील या पाणीसाठ्याचा शेतीसाठी होणारा वापर मात्र कमी आहे.

Water Stock
Water Shortage : पुणे विभागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र

एका आठवड्यात या धरणांमधील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. गेल्या आठवड्यात नातूवाडी ४९.८२ टक्के, गडनदी ६७.७० टक्के, अर्जुना धरण प्रकल्पात ८७.०७ टक्के पाणीसाठा होता. असह्य उकाड्यामुळे आठवड्यामध्ये या धरणांमधील पाणीसाठा घटला आहे.

पाटबंधारे विभागाने घेतलेल्या आकडेवारीनुसार, ४६ धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ११३.०६ दलघमी एवढा आहे. ही टक्केवारी ४७.१२ टक्के आहे. आठवड्यात सुमारे १.६६ दलघमी एवढा पाणीसाठा कमी झाला आहे. हे प्रमाण असेच राहिले तर अजून अडीच महिन्यामध्ये पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागणार असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com