Marathwada Water Storage : मराठवाड्यातील पाणीसाठे ६६.२३ टक्क्यांवर

Water Stock : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७९ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ६६.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagqar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८७९ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ६६.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. अजूनही मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा अजूनही निम्म्यावर पोहोचला नसल्याची स्थिती आहे.

मराठवाड्यातील मोठ्या ११ प्रकल्पांत आत्ताच्या घडीला ७९.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ६४.१८ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून तेरणा, मांजरा, रेना नद्यांवरील २७ बंधाऱ्यांत ५२.०५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम ७५ प्रकल्पांत ४२.९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून, लघू ७५१ प्रकल्पांत ४०.३४ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

Water Storage
Dam Water Storage : प्रकल्पांतील उपयुक्त साठा पोहोचला २८.४८ टक्क्यांवर

माजलगाव प्रकल्पात सर्वांत कमी पाणी

मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्प सर्वांत कमी २४ उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्या पाठव पाठव मांजरा प्रकल्पातही केवळ ३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

जायकवाडी प्रकल्पात ९२ टक्के, येलदरीत ८१ टक्के, सिद्धेश्‍वरमध्ये ६७ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ८५ टक्के, निम्न तेरणा ७९ टक्के, निम्न मनार ६१ टक्के, विष्णुपुरी ७० टक्के, निम्न दुधना ६० टक्के, सीना कोळेगाव ५७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

लातूरमधील मध्यम प्रकल्पात सर्वांत कमी पाणी

मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांत सरासरी ४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामध्ये सर्वांत कमी लातूरमधील आठ मध्यम प्रकल्पांत केवळ १९ टक्के उपयुक्त पाणी आहे. त्या पाठोपाठ जालना जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांत २६ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत ३३ टक्के, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ४५ टक्के, परभणीतील २ प्रकल्पांत ५३ टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पांत ५५ टक्के, तर बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत सर्वाधिक ६१ टक्के उपयुक्त पाणी साठले गेले आहे.

Water Storage
Maharashtra Water Storage: राज्यात यंदा आठ टक्के अधिक पाणीसाठा

हिंगोलीतील लघू प्रकल्पांत सर्वांत कमी पाणी

मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पांत सर्वांत कमी १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत २६ टक्के, लातूर जिल्ह्यातील १३५ लघू प्रकल्पांत २७ टक्के, जालन्यातील ५७ प्रकल्पांत ३४ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ३९ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत ४५ टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पांत ४८ टक्के, तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पांत सरासरी ६१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

पाच लघू प्रकल्प अजूनही कोरडेच

मराठवाड्यातील ७५१ लघू प्रकल्पांपैकी धाराशिवमधील तीन व जालना संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक मिळून पाच लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. तब्बल १३२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही ज्योत्याखालीच आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २४, जालन्यातील १६, बीडमधील २६, लातूर २४ , धाराशिव २२, नांदेड १०, परभणी ८, तर हिंगोलीतील २ लघू प्रकल्पांचा समावेश आहे. सहा मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा अजूनही जोत्याखालीच आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिवमधील प्रत्येकी एक, तर बीडमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com