Koyna Dam Satara : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरणातील पाणीसाठा होतोय कमी, विजेचा प्रश्न गंभीर

: कोयना धरणात ६८ टीएमसी पाणी आहे. तर वीजनिर्मितीसाठीचा पाणीसाठा केवळ २४ टीएमसी आहे.
Koyna Dam Satara
Koyna Dam Sataraagrowon

Maharashtra Koyna Dam : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण पुढच्या दोन महिन्यात तळ गाठण्याची शक्यता आहे. कोयना धरण जल विद्युत केंद्रावर यंदा पाणीटंचाईचे सावट गडध होत चालले आहे. कोयना धरण क्षेत्रात यंदा कमी पाऊस झाल्याने झाल्याने धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

सध्या कोयना धरणात ६८ टीएमसी पाणी आहे. तर वीजनिर्मितीसाठीचा पाणीसाठा केवळ २४ टीएमसी आहे. मागील वर्षाचा विचार करता जवळपास सहा टीएमसी पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पुढील तीन महिने कोयनेतून वीजनिर्मिती करताना महानिर्मितीला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

महानिर्मितीची एकूण वीजनिर्मिती क्षमता सुमारे १४ हजार मेगावॉटच्या घरात असून त्यांच्याकडून महावितरणला सरासरी आठ-नऊ हजार मेगावॉट एवढ्या विजेचा पुरवठा केला जातो. एकट्या कोयना धरणाची वीजनिर्मिती क्षमता सुमारे १,९६० मेगावॉट एवढी आहे. त्यामधून विजेच्या मागणीनुसार १,९०० मेगावॉटपर्यंत वीजनिर्मिती करता येते, मात्र यंदा कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची कमी नोंद झाल्याने तब्बल १०५ टीएमसी एवढी मोठी क्षमता असतानाही धरण केवळ ९४ टीएमसीपर्यंत भरले होते.

तसेच एकूण क्षमतेच्या ६७.५ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरता येते. आतापर्यंत महानिर्मितीने सुमारे ४२ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले असून सध्या वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा साठा २४ टीएमसी एवढा कमी आहे. वाढत्या तापमानामुळे पुढील तीन महिन्यांत राज्याची विजेची मागणी वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्यात पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यावर मर्यादा येत असल्याची माहिती महानिर्मितीच्या अधिकाऱ्याने दिली.

Koyna Dam Satara
Kolhapur Farmer Drought : दुष्काळाच्या धास्तीने शेतकरी उसाऐवजी ज्वारी पिकाकडे वळतोय

परिस्थिती बिघडण्याची शक्यता

राज्याच्या विजेच्या मागणीत अचानक वाढ झाल्यास कोळशावरील वीज प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती वाढवता येत नाही, तेव्हा जलविद्युत प्रकल्पातून तत्काळ वीजनिर्मिती सुरू करून ग्रीडची स्थिरता राखली जाते, मात्र पुढील काळात कोयना धरणातच पाण्याचा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात अचानक विजेची मागणी वाढल्यास तत्काळ वीजनिर्मिती वाढवताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे परिस्थिती विघडण्याची भीती आहे.

कोयना वीज न केंद्रातून महानिर्मितीकडून वीजनिर्मिती केली जात असली 66 तरी कोणत्या वेळी किती वीजनिर्मिती करायची याचे नियोजन महावितरण आणि राज्य भार प्रेषण केंद्राकडून केले जाते, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत कमी पाणी असल्याने वीजनिर्मिती करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ए. डी. शिंदे, मुख्य अभियंता, कोयना वीज केंद्र

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com