Nashjk News : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरीत एप्रिलमध्ये भीषण पाणीटंचाईला आदिवासी नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत. पावसाळ्यात सुमारे चार हजार मिमी पाऊस पडत असूनही पाण्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा आतापासूनच सुरू झाल्या आहेत.
भावली धरणातून ३२ कोटी रुपये खर्चून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाण्याची पाइपलाइन घेतली आहे. मात्र तरीही इगतपुरी शहरात पाच वर्षांपासून आठवड्यातून तीन दिवसच पाणीपुरवठा केला जात आहे.
नगर परिषद हद्दीतील तळेगाव शिवारातील कातुरवाडी, वाघाचा झाप, मेंगाळ झाप या वस्तीमधील दोनशे ते अडीचशे लोकसंख्या वस्ती असलेल्या आदिवासी नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या वाडीच्या नागरिकांना थेट दोन किलोमीटर असलेल्या घाटनदेवी मंदिरसमोरील खोल उंट दरीतील झऱ्यातील पाणी पिण्यासाठी आणावे लागत आहे. मात्र वर्ष उलटून गेले तरीही या पाइपलाइनला पाणी आलेच नाही.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.