
Wada News : तालुक्यात बारमाही मुबलक पाणी असणाऱ्या वैतरणा, पिंजाळ, गारगावी, देहर्जे व तानसा अशा नद्या आहेत; मात्र नियोजनाअभावी यातील काही नद्या कोरड्या पडतात. तानसा नदीवर बंधारे नसल्याने ती नदी मार्चअखेरपर्यंत कोरडी पडते.
त्यामुळे पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. यासाठी या नदीवर काही किलोमीटर अंतरावर बंधारे बांधावेत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
वाडा तालुक्यात १७० गावे व २५० हून अधिक पाडे आहेत. तालुक्याची लोकसंख्या दोन लाखांच्या आसपास आहे. तालुक्यात औद्योगिकीकरणाचा ओढा वाहत आहे.
मात्र त्यामानाने पाणी समस्येचे निराकरण होत नाही. येथे औद्योगिकीकरणामुळे रोलिंग मिल, शीतपेये कारखाने आले आहेत. या कंपन्यांना पाण्याची मोठी गरज असल्याने पाण्याचा मोठा उपसा होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.