Jalgaon Water Management : जळगाव जिल्ह्यात यंदा पाण्याचा प्रश्न कमी; चाराही मुबलक

Kharip Season Jalgaon : यंदा ओल्या दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट झाली. परंतु अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक होता. यामुळे रब्बी हंगामाची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली.
Jalgaon Water
Jalgaon WaterAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Water : यंदा ओल्या दुष्काळामुळे खरिपातील पिकांची स्थिती बिकट झाली. परंतु अनेक प्रकल्पांत जलसाठा मुबलक होता. यामुळे रब्बी हंगामाची पेरणी अपेक्षेपेक्षा अधिक झाली. यातून चाराही पुरेसा, हवा तेवढा उपलब्ध झाला आहे.

मागील खरिपात अतिपावसामुळे मका, बाजरी व इतर पिके खराब झाली. त्यापूर्वी म्हणजेच २०२३-२४ मध्ये दुष्काळामुळे शिवारात पिके करपली होती. शेतकऱ्यांच्या हाती पुरेसा चाराही लागला नाही, यामुळे महाग चारा घ्यावा लागला होता. तसेच टंचाईदेखील होती. पण २०२४-२५ मध्ये पाऊस चांगला झाला. सर्व प्रकल्पांत जलसाठे मार्चपर्यंत मुबलक होते. अलीकडे जलसाठे घटत आहेत. परंतु रब्बी हंगाम हाती आला आहे. तसेच उन्हाळ हंगामही बऱ्यापैकी आहे.

Jalgaon Water
Sugarcane Jalgaon : खानदेशात ऊस गाळप पोहोचले २४ लाख टनांवर

२०२३-२४ मध्ये वार्षिक सरासरीच्या ८१ टक्के इतका पाऊस झाला. मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये कमी जलसाठा उन्हाळ्यात होता. पाण्यासाठी अनेक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, जळगावातील चाळीसगाव, अमळनेर, बोदवड आदी भागांत स्थिती गंभीर होती.

धुळे, साक्री, शिरपूर या तीन तालुक्यांतील एकूण २८ महसूल मंडलांत दुष्काळसदृश परिस्थिती होती. पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला सतत बैठका व नियोजन करावे लागले होते. परंतु यंदा जळगाव जिल्ह्यात अमळनेरात टंचाई सुमारे १४ गावांत आहे. अन्य भागात टंचाई अधिक नाही. तसेच चारा मुबलक आहे. मका, बाजरी, दादर ज्वारी, संकरित ज्वारीचा चारा उपलब्ध होत आहे.

पुरेसा चारा

सध्या चारा पुरेसा आहे. तसेच पाण्याची समस्याही नाही. दिवसभरात गायीला सरासरी सुमारे ४० किलो चारा लागतो. तसेच म्हशीला सरासरी ५० किलो चारा लागतो. एवढा चारा दूध उत्पादक पशुधनास देऊ शकत नाहीत. चारा दर आवाक्यात आहेत. त्यावरील खर्च कमी झाला आहे.

अनेक शेतकरी मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठवित आहेत. एक, तीन व पाच टनांची एक बॅग चारा साठवणुकीसाठी वापरली जात आहे. दूध उत्पादकांनी चाऱ्याची साठवणूक केली आहे. हिरव्या चाऱ्याची लागवडही अनेक दूध उत्पादकांनी केली होती. त्यातूनही चारा उपलब्ध होत आहे.

पिण्याचे पाणीही पुरेसे

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना पाणीही मुबलक आहे. २०२३-२४ मध्ये अनेक दूध उत्पादकांना किंवा जळगावातील अमळनेर, चाळीसगाव भागात पशुधनासाठी टँकरने पाणी आणावे लागले होते. सध्या पशुधनासाठी टँकरची गरज अपवाद वगळता नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com