
Solapur News : गतवर्षी पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने भरलेल्या उजनी धरणाची पाणीपातळी सध्या ३३.८१ टक्क्यांवर आल्याने आता उजनीची वाटचाल लवकरच उणे पातळीकडे सुरू होत असून, अवघ्या अडीच ते पावणे तीन महिन्यात म्हणजे ८० दिवसात पाण्याची पातळी खालावल्याने आता आगामी तीन- चार महिने कसे जाणार, हा चिंतेचा विषय होणार आहे.
पावसाळ्यात धरण भरल्यानंतर ११७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होतो. धरणाचा ६३.६५ टक्के एवढा सर्वात मोठा मृतसाठा आहे. तर त्यापैकी ५३.५७ टक्के उपयुक्त साठा आहे. दरवर्षी फेब्रुवारीदरम्यान सोलापूरसाठी पाणी सोडण्यास सुरवात होते.
यंदाही जानेवारीपर्यंत शंभर टक्के पाणीसाठा होता. फेब्रुवारी, मार्च दरम्यान खाली पाणी सोडण्यात आले शिवाय, सीना माढा, दहिगाव, मुख्य कॅनॉल यातूनही पाणी सोडण्यात आले. पण पाण्याची ही अवस्था पाहता, पाण्याचे नियोजन करण्यात शासन अपयशी ठरत आहे, असे दिसते.
पावसाळ्यात तब्बल १११ टक्क्यांपर्यंत झालेला पाणीसाठा आता उन्हाळ्यात ३३.८१ टक्क्यांवर आला आहे, धरण लवकरच उणेपातळीत जाणार आहे. धरणातील पाणी झपाट्याने रिकामे होत असल्याने उजनी फुगवट्यावर अवलंबून असलेल्या करमाळा, इंदापूर, कर्जत तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीच्या तसेच पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. बागायती पिके ऐन उन्हाळ्यात संकटात येणार आहेत. यामध्ये ऊस, केळी, फळबागांचा प्रामुख्याने समावेश आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.