Water Storage : सांगलीतील प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात होतेय घट

Water Crisis : जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९ हजार ४४० दशलक्ष घनफूट आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात मध्यम आणि लघू ८६ प्रकल्प आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ४ हजार ८६७ दशलक्ष घनफूट इतका म्हणजे ६३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ८१ टक्के पाणीसाठा होता. दीड महिन्यात १८ टक्क्यांनी पाणी साठा कमी झाला आहे. त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईच्या शक्यतेमुळे बळीराजा संकटात सापडला असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ५ मध्यम व ७८ लघू असे एकूण ८३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९ हजार ४४० दशलक्ष घनफूट आहे. जूनपासून ऑक्टोबरअखेर पाऊस झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा वाढला होता. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ८३ प्रकल्पांत ८१ टक्के म्हणजे ६ हजार २६८ दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा होता.

जत तालुक्यात सर्वाधिक प्रकल्प असून २८ प्रकल्पाची संख्या आहे. नोव्हेंबर महिन्यात जत तालुक्यातील प्रकल्पात ५७ टक्के पाणी साठा होता. तर आटपाडीतील प्रकल्पात ९१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यापर्यंत पाणी टंचाई भासणार नाही, अशी शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तवली होती.

Water Storage
Water Storage : खानदेशातील प्रकल्पांत मुबलक जलसाठा

टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी योजनांमुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागात बागायती क्षेत्र वाढले आहे. बहुतांश शेती या प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शेतकरी प्रकल्पातील पाणी उचलून शेतीला देत आहेत. गेल्या दीड महिन्यात शेतकऱ्यांनी प्रकल्पातील पाणी पिकांना दिले आहे. त्यामुळे साठा कमी होऊ लागला आहे. आटपाडी, जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रकल्पातील साठा कमी झाला आहे.

नोव्हेंबरमध्ये जिल्ह्यातील ८३ प्रकल्पापैकी ५६ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले होते. दीड महिन्यानंतर ३ प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. अर्थात दीड महिन्यात ५६ प्रकल्पांतील पाणीसाठा कमी झाला आहे. जिल्ह्यातील ३० प्रकल्पांत ७५ टक्के, ३३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, ७ प्रकल्पांत २५ ते ५० टक्के आणि एका प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोरडे प्रकल्प दोन आणि सात प्रकल्पांत मृत पाणीसाठा आहे.

Water Storage
Dam Water Storage : धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; नोव्हेंबरपासून पाणीपातळीत झाली घट

सध्या जिल्ह्यात पाणी टंचाई स्थिती नाही. परंतु शेतीसाठी प्रकल्पातील पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात संभाव्य पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पाणी टंचाईच्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ताकारी म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचना योजना सुरू केल्या आहेत. परंतु या योजनांच्या माधम्यातून प्रकल्प पाण्याने पूर्ण क्षमतेने भरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुकानिहाय प्रकल्पांतील पाणीसाठा दृष्टिक्षेप

तालुका प्रकल्प संख्या उपयुक्त पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तासगाव ७ ४७०.९८

खानापूर ८ ४४०.०३

कडेगाव ७ ४२६.५६

शिराळा ५ ६९३.९८

आटपाडी १३ ९०७.०१

जत २७ ११३०.२८

कवठेमहांकाळ ११ ६५६.२४

मिरज ३ ११४.६७

वाळवा २ २७.२३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com