
Jalgaon News : खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा मुबलक असून, हा साठा सुमारे ७५ टक्के आहे. गिरणा धरणातील साठा ८८ टक्के आहे. जलसाठा मुबलक असल्याने पुढे टंचाई राहणार नाही, अशी स्थिती आहे.
मागील महिन्यातही पाऊस झाला. तसेच पूर्वी पाऊसमान चांगले झाले. पाण्याचा उपयोग कमी असून, यंदा मुबलक आहे. ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी सतत झाली आहे. आता रब्बीसाठी शेतकऱ्यंना थंडीची प्रतीक्षा आहे.
भुसावळ (जि. जळगाव) येथील तापी नदीवरील हतनूर धरणासह गिरणा, वाघूर प्रकल्पातील जलसाठा यंदा मुबलक आहे. त्यातूनही रब्बीस पाणी देण्यात आले आहे. तसेच धुळ्यातील पांझरा, अनेर प्रकल्पांतूनही रब्बीला पाणी देण्यात आले असून, या प्रकल्पांतील जलसाठा १०० टक्क्यांवरून ८५ ते ९० टक्के झाला आहे.
काही दिवसांपूर्वी तापी नदीला प्रवाही पाणी हतनूरमधून नदीत सोडले होते. गिरणा नदीतही पाणी आहे. खानदेशात धुळ्यातील पांझरा, अनेर, नंदुरबारमधील गोमाई, उदय, सुसरी, जळगावात कांग, अंजनी, सुकी, भोकर, वाघूर आदी नद्यांना प्रवाही पाणी डिसेंबरच्या सुरुवातीसही होते. यामुळे टंचाई दूर झाली आहे. तसेच गिरणा नदीवरील गिरणा धरणातील साठा आवर्तन सुटल्याने काहीसा कमी झाला आहे. मागील वेळेस या धरणात ५६ टक्के जलसाठा सप्टेंबरअखेर होता.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव, जळगाव या तालुक्यांमधील अनेक गावांमधील टंचाई दूर करण्यासाठी गिरणा धरणातून पाणी यंदाही मिळत आहे. रब्बीत २१ हजार हेक्टरला गिरणा धरणाचा लाभ मिळत आहे. या धरणातून आणखी दोनदा नदीत पाणी सोडले जाणार आहे. धरणाची साठवण क्षमता १८ टक्के आहे. गिरणा धरणातील पाण्याचा चांगला लाभ गिरणा काठच्या गावांना झाला आहे.
हतनूर (ता. भुसावळ) धरणात यंदाही जलसाठा १०० टक्के होता. त्यातून रब्बीला तीन वेळेस पाणी देण्यात येईल. यातील एक आवर्तन देण्यात आले आहे. दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर, जळगाव येथील औद्योगिक वसाहत व नदीकाठच्या सुमारे १० गावांमधील टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडले जाते.
या धरणाात ५४ टक्के गाळ असल्याने जलसाठा झपाट्याने घटतो. जामनेरातील वाघूर धरणाची साठवण क्षमता आठ टीएमसी आहे. यातही सुमारे १०० टक्के जलसाठा आहे. जळगाव जिल्ह्यातील अंजनी, तोंडापूर, अभोडा, मंगरूळ, सुकी, मोर, अग्नावती, मन्याड, बोरी या धरणांतील साठाही मिळून ८० टक्क्यांपर्यंत आहे. धुळ्यातील अनेर, पांझरा, अमरावती, सोनवद, बुराई या प्रकल्पांतील साठाही मुबलक आहे. नंदुरबारमधील दरा, चिरडे, सुसरी, देहली प्रकल्पात जलसाठा मुबलक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.