
Jalgoan News : खानदेशात जलसंकट तयार होत आहे. जळगावात पारोळा, अमळनेर, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा भागातील प्रकल्पांत ठणठणाट आहे. धुळे व शिंदखेडा (जि. धुळे) तालुक्यांतही सिंचन प्रकल्प रिकामे आहेत. त्यामुळे टंचाईचे संकेत गहिरे होत आहेत.
पारोळा तालुक्यास महत्त्वाच्या असलेल्या बोरी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा फक्त १२ टक्क्यांवर आहे. भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, पारोळा, अमळनेर भागात लघू प्रकल्प रिकामे आहेत. पाणीप्रश्न चिंतेची बाब बनला आहे. मन्याड, अग्नावती, बहुळा, अंजनी हे प्रकल्प पुढे भरतील की नाही, अशी स्थिती आहे.
बोरी धरण व पारोळा, अमळनेर तालुक्यांतील इतर लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे पिकांची उगवण क्षमता मोठ्या प्रमाणात खुंटली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. बोरी धरणातून १२ ते १३ गावे व पारोळा शहरास पाणीपुरवठा केला जातो. भोकरबारी, म्हसवे, शिरसमणी, पिंपळकोठा, कंकराज या प्रकल्पांतील साठाही संपत आला आहे. मागील वर्षी बोरी धरण हे १५ ऑगस्टपूर्वी तुडुंब भरून वाहत होते. मात्र आता धरणाच्या पाणीपातळी चिंताजनक आहे.
धुळ्यात सोनवद प्रकल्प रिकामाच आहे. साक्री-नंदुरबार व शिंदखेडानजीकचा बुराई प्रकल्पदेखील रिकामाच आहे. अमरावती, मालनगाव या प्रकल्पांत कुठलाही जलसाठा मागील १० दिवसांत वाढलेला नाही. नंदुरबारमधील शहादा तालुक्यातही सुसरी प्रकल्प यंदा भरलेला नाही. या प्रकल्पात मागील वर्षी मुबलक जलसाठा होता. नद्याही प्रवाही होत्या. खानदेशातील ३० गावांत पुढे टंचाई वाढू शकते. शिंदखेडा, धुळे व नंदुरबार तालुक्यांत स्थिती अधिक बिकट बनेल, अशी माहिती आहे.
- पाणीपातळी ः २६३.६६० मी.
- एकूण पाणीसाठा ः १८.१११ दलघमी
- जिवंत पाणीसाठा ः २.९५१ दलघमी
- टक्केवारी ः ११.७३ टक्के
- पाणीपातळी ः १०२.५४ मी.
- एकूण पाणीसाठा ः ०.३१० दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा ः ०.०५७ दलघमी
- टक्केवारी ः ३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.