Maharashtra Lok Sabha Elections : महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान; बारामतीचा रणसंग्राम या तारखेला

Lok Sabha Elections : देशातील लोकसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा दिल्लीत केली.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionAgrowon

Pune News : अख्या देशाचे लक्ष लोकसभा निवडणूका कधी लागणार याकडे लागले होते. दरम्यान शनिवार (ता.१६) निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकांसह ४ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा घोषणा करण्यात आली. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही घोषणा दिल्लीत केली. तर लोकसभेच्या ५४३ जागांवर ७ टप्प्यात मतदान होणार असून १९ एप्रिल ते १ जून पर्यंत ७ टप्प्यात मतदान होणार आहे. तर निकाल ४ जूनला लागेल अशी माहिती कुमार यांनी दिली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांसह जनतेचे लक्ष देखील राज्यातील निवडणुकांच्या तारखांकडे लक्ष लागले होते. या तारखांची घोषणा देखील आयुक्त कुमार यांनी केली. आयुक्त कुमार यांनी राज्यात लोकसभा निवडणुकांचे मतदान हे पाच टप्प्यात होईल असे सांगितले आहे. 

राज्यात लोकसभा निवडणुकांवरून सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. तर विविध राजकीय पक्षांसह आघाड्यांमध्ये उमेदवार निवडीवरून पेच निर्माण झाले आहेत. दरम्यान अनेक मतदार संघात आपणच उमेदवार असू, असे नेते स्पष्टीकरण देत आहेत. यादरम्यान काही ठिकाणी एकाच घरातील दोन उमेदवार एममेकांच्या समोर उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Lok Sabha Election
Lok Sabha Elections : देशात लोकसभा निवडणूकांचा धुरळा ७ टप्प्यात, ४ जूनला निकाल

राज्यातील बारामती आणि कोल्हापूर असे दोन मतदार संघ हे हाय होल्टज मतदार संघ ठरले आहेत. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर कोल्हापुरात शाहू महाराज छत्रपती आणि कागलचे समरजित घाटगे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. मात्र विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी आपल्यालाच संधी मिळेल असे म्हटले आहे. 

दरम्यान निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेप्रमाणे महाराष्ट्रात पुढील प्रमाणे मतदान होईल

Lok Sabha Election
Lok Sabha Election : सोलापूर जिल्ह्यात दीड हजार मतदारांसाठी एक केंद्र

असे होणार महाराष्ट्रात मतदान

पहिला टप्पा -

१९ एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा -

२६ एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा -

०७ मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा -

१३ मे - नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा -

२० मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम मुंबई , मुंबई पूर्व, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई दक्षिण

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com