Maharashtra Drought Village : केंद्रीय पथकाच्या दुष्काळग्रस्त गावांना भेटी

Drought Update : सोलीपुर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या दोन सदस्यांचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले होते.
Maharashtra Drought
Maharashtra DroughtAgrowon
Published on
Updated on

Solapur News : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाच्या दोन सदस्यांचे पथक जिल्हा दौऱ्यावर आले असून, या पथकाने बुधवारी (ता. १३) माळशिरस आणि सांगोला तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन दुष्काळाच्या तीव्रतेची तसेच नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी पिकांची पाहणी केली.

या वेळी दुष्काळामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशीही पथकातील सदस्यांनी संवाद साधला. त्या वेळी शेतकऱ्यांनी अडचणी मांडल्या, ‘साहेब खरीप गेला, रब्बीही गेला, आता खायचे काय,’ असा प्रश्‍न या पथकाला केला.

जिल्ह्यातील माळशिरस, बार्शी, सांगोला, माढा व करमाळा या पाच तालुक्यांत, तर जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यातील ४५ महसूल मंडळांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. केंद्र शासनाकडून दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत देण्यात येते. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी ही पाहणी केली.

Maharashtra Drought
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त मंडळे जाहीर, उपाययोजनांकडे दुर्लक्ष

या पथकात केंद्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे.

या पथकाने जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी माळशिरसच्या सुळेवाडी येथून केली. येथील शेतकरी सुनील हाके यांच्या शेतातील तूर पिकाची पाहणी केली, तर शेतकरी दयानंद कोळेकर यांच्या शेतातील विहिरीतील पाणीपातळीची पाहणी ही पथकाकडून करण्यात आली.

शिंगोर्णी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील दुष्काळामुळे नुकसान झालेल्या मका पिकाचीही पाहणी पथकाकडून करण्यात आली. तर सांगोला तालुक्यातील आचकदणी, महूद बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मका, ज्वारी, ऊस डाळिंब या पिकांची पाहणी त्यांनी केली.

Maharashtra Drought
Maharashtra Drought : केंद्रीय पथकाकडून बारामती तालुक्यात पाहणी

या वेळी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, माळशिरस उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, माढा उपविभागीय अधिकारी ज्योती आंबेकर, कृषी उपसंचालक तथा प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. के. वाघमोडे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशीला देशमुख, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. समीर बोरकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण अधिकारी एम. ए. जे. शेख, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एस. नरळे उपस्थित होते.

पाणी, चाऱ्याची घेतली माहिती

या वेळी केंद्रीय दुष्काळ पथकाने पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी, पाझर तलाव, शेतकऱ्यांच्या शेतातील कोरड्या पडलेल्या विहिरी, शेतकऱ्यांसाठी सध्या असलेल्या पाण्याची व्यवस्था, जनावरांचा चारा, पाणीपातळीची खोली आदी कामे याबाबत पाहणी करून माहिती घेतली.

साहेब, आता खायचे काय?

कमी पावसामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची सध्या टंचाई जाणवत असून, तातडीने चारापाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर दुष्काळामुळे नुकसान झालेल्या तूर, मका, ज्वारी, ऊस व अन्य पिकांची माहिती दिली. या नुकसान झालेल्या पिकांसाठी शासनाकडून त्वरित मदत मिळावी, अशी मागणी करताना साहेब खरीप गेला, रब्बीही गेला, आता खायचे काय, अशी व्यथा मांडली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com