Agri Awareness Campaign : साठ गावांत पोहोचले कृषी संकल्प अभियान

Viksit Krishi Sankalp : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे २९ मेपासून सुरु झालेले विकसित कृषी संकल्प अभियान आजपर्यंत एकूण ६० गावात पोहोचले त्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Agri Awareness Campaign
Agri Awareness Campaign Agrowon
Published on
Updated on

Jalna News : खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे २९ मेपासून सुरु झालेले विकसित कृषी संकल्प अभियान आजपर्यंत एकूण ६० गावात पोहोचले त्यास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हे अभियान कृषी विज्ञान कार्यक्षेत्रात एकूण ९० गावात हजेरी लावणार आहे.

अभियान मंठा तालुक्यातील पांगरा गडदे, पेवा आणि किर्तापूर, तर परतूर तालुक्यातील देवळा, सालगाव आणि सातोना बु. या गावात पोहोचले. परतूर तालुक्यातील सातोना बु. येथे उपविभागीय कृषी अधिकारी राम रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या अभियानात कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांव्यतिरिक्त भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. थंगासामी, डॉ. राजीव काळे, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. विनायक इंगळे, कृषी विभाग व आत्माचे अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती.

Agri Awareness Campaign
Agri Mission 2025 : विकसित कृषी संकल्पांतर्गत शास्त्रज्ञ थेट बांधावर

शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या खरीप पिकाबद्दल तर कांदा, लसूण, मोसंबी, डाळिंब, सीताफळ यासारख्या महत्त्वाच्या पिकांबद्दल आणि दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन, अन्नप्रक्रिया यासारखे शेतीपूरक उद्योग, तसेच नैसर्गिक शेती, बीजप्रक्रिया, उगवणशक्ती चाचणी, पर्जन्यमान व्यवस्थापन, इत्यादी विषयांवर शास्त्रज्ञांकडून माहिती मिळत आहे.

Agri Awareness Campaign
Agri Mission 2025 : अहिल्यानगरमध्ये १२ गावांत विकसित कृषी संकल्प अभियान

शेतकऱ्यांचे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग आणि त्यांच्या प्रतिक्रिया सरळ संशोधन संस्था आणि केंद्रीय कृषी मंत्रालयापर्यंत पोहोचत असल्यामुळे त्याचा भविष्यातील संशोधन व विकासासाठी फायदा होणार आहे. अभियानात समाविष्ठ कृषिरथ व त्यावरील माहिती शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांचे हे महत्त्वाकांक्षी अभियान येत्या १२ जूनपर्यंत चालणार असून अभियानाचा समारोप समारोप रांजणी आणि गाढे सावरगाव (ता. घनसावंगी) येथे होणार आहे. आजपासून हे अभियान परतूर तालुक्यातील एदलापूर, बाबुलतारा, वाघाडी, आनंदवाडी, खांडवी आणि उस्मानपुरा या गावात जाणार असल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com