Agriculture Chief Secretary : कृषी विभागाच्या सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी

Vikas Chandra Rastogi : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या कृषी विभागाच्या सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती गुरुवारी (ता. २) करण्यात आली.
Vikas Chandra Rastogi
Vikas Chandra Rastogi Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : गेल्या चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी विकासचंद्र रस्तोगी यांची नियुक्ती गुरुवारी (ता. २) करण्यात आली. रस्तोगी यांच्यासह १० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, कृषी विभागाच्या प्रभारी सचिव जयश्री भोज यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

रस्तोगी हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव होते. त्याआधी सामान्य प्रशासन विभागात ते कार्यरत होते. १९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले रस्तोगी २०१६ ते सप्टेंबर २०१९ या काळात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प संचालक होते. ‘पोकरा’ योजनेची पायाभरणी आणि अंमलबजावणी करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

Vikas Chandra Rastogi
Agriculture Commissioner : कृषी आयुक्तपदाची सूत्रे सूरज मांढरे यांनी स्वीकारली

मागील पाच वर्षांत कृषी विभागात तीन सचिव आणि कृषी आयुक्त झाले. कृषी विभागाची धुरा तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वीकारल्यानंतर अनुपकुमार यांची बदली करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारमध्ये प्रतिनियुक्तीवर असलेल्या व्ही. राधा यांची नियुक्ती करण्यात आली.

मात्र अवघ्या दोन महिन्यांत त्यांचीही बदली करण्यात आली. दरम्यान, सुनील चव्हाण, प्रवीण गेडाम आणि रवींद्र बिनवडे असे तीन कृषी आयुक्त झाल्याने कृषी विभागाचा पुरता खेळखंडोबा झाला होता. प्रमुख दोन पदांवर संगीत खुर्चीचा खेळ झाल्याने प्रशासनात ढिसाळपणा आला असून कंत्राटदारांची लॉबी योजना आखून त्या अंमलात आणण्यासाठी सक्रिय झाली आहे. त्यामुळे ही लॉबी मोडून काढणे आणि डीबीटी धोरणाची कडक अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान रस्तोगी यांच्या समोर आहे.

Vikas Chandra Rastogi
Agriculture Department : पदनाम बदलाबाबत कृषी सहायकांशी सापत्न वागणूक

रस्तोगी यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे प्रकल्प संचालक म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. या योजनेतील गावांची निवड, प्रकल्पाचा आराखडा तयार करणे आणि प्रकल्पात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम त्यांनी केले आहे.

१० अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, कृषी विभागाच्या प्रभारी सचिव जयश्री भोज यांची अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या सचिव, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल याची पर्यावरण विभागात, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांची कामगार विभागात,

सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची वन विभागात, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी यांची उच्च व तंत्र शिक्षण विभागात, राष्ट्रीय उच्चतंत्र शिक्षण अभियानाचे कार्यकारी अधिकारी निपूण विनायक यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी पदी तर हर्षदीप कांबळे यांची सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com