
Amravati News: अडचणीतील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देत त्यांचा सातबारा कोरा करावा, अशा आशयाचा ठराव वरुड बाजार समितीने घेतला आहे. बाजार समितीच्या सभेत सर्वानुमते हा ठराव मंजूर करीत तो पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आला आहे.
वरुड बाजार समितीचे सभापती नरेंद्र ऊर्फ बबलू शेषराव पावडे व संचालक मंडळाने हा ठराव घेतला त्यानुसार, यापूर्वी फडणवीस सरकारच्या काळात शेतकऱ्यांना काही लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. त्याकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पार पाडावी लागली. यामधील अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले.
सद्यःस्थितीत अनेक शेतकऱ्यांची कर्ज भरणा करण्यासारखी आर्थिकस्थिती नाही. त्यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यातूनच यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना पैशाची जुळवाजुळव करणे आव्हानात्मक ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने कर्जमाफी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता सरसकट कर्जमाफी करीत शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सभापती बबलू पावडे, उपसभापती बाबाराव मांगुळकर, संचालक राजेश गांधी, वनराज कराळे, सुजित पाटील, प्रमोद ऊर्फ बाळू पाटील, बाबाराव लोखंडे, अमित कुबडे, जाबीर खान जहागीर खान, प्रशांत पाटील, प्रवीण ऊर्फ शेशू मानकर, अंकुश पाटील, मुकेश देशमुख, प्रणय सोंडे, नरेंद्र पांडव, हिराकांत उईके, अर्चना मुरुमकर, रोशनी मानकर, नंदकिशोर बोडखे, शेतकरी विकास भोंडे, अमोल उपासे, ज्ञानदेव पाटील, बाळासाहेब ताठोडे उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.