
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ५२.३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारी (ता.७) सकाळी ६ वाजता प्रकल्पात २४ हजार १९२ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती.
प्रकल्प प्रशासनाच्या माहितीनुसार, नाथसागरात नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. प्रकल्पाची पाणीपातळी १५१२ फूट (४६०.८५८ मिटर) इतकी आहे.
प्रकल्पात एकूण पाणीसाठा १८७४.८५५ दशलक्ष घनमीटर, तर जिवंत पाणीसाठा ११३६.७४९ दशलक्ष घनमीटर झाला आहे. सोमवारी सकाळी प्रकल्पात पाण्याची आवक २४ हजार १९२ क्युसेकने सुरू होती, अशी माहिती धरण शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली.
नाशिक, अहिल्यानगर भागांत जून महिन्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाची पाणीपातळी वाढण्यास सुरुवात झाली. पावसाळा सुरू होण्याअगोदर धरणात २९ टक्के पाणीसाठा होता. या पाणीसाठ्यात सुरुवातीला हळूहळू पाणी येण्यास सुरुवात झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.