
Nanded News : नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या वेळी वीज पडून एका व्यक्तीसह लहान-मोठी १३ जनावरे दगावली आहेत. या पावसामुळे जिल्ह्यातील जिरायती बागायती व फळपीक असे एकूण ४६.३८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. या अवकाळीचा फटका सात तालुक्यांमधील १७ गावातल्या ८७ शेतकऱ्यांना बसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने जिल्ह्याला अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. यानुसार नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात वातावरणात बदल झाला. दुपारनंतर जिल्ह्याच्या अर्धापूर कंधार लोहा, नायगाव, मुदखेड व हदगाव या तालुक्यात वादळी वारे वाहू लागले.
यातच अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात उन्हाळी ज्वारी, चारापिके यासह बागायती व फळपिकांना फटका बसला. अवेळी पावसामुळे जिल्ह्यातील जिरायती बागायती व फळपिक असे एकूण ४६.३८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. या अवकाळीचा फटका सात तालुक्यामधील १७ गावातल्या ८७ शेतकऱ्यांना बसला. पावसावेळी वीज पडून मुखेड तालुक्यातील एक व्यक्तीचा मृत्यू झाला.
तर लहान-मोठी १३ जनावरे दगावली आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेशित केले होते. यानुसार केलेल्या पाहणीत जिल्ह्यात एकूण ४६.३८ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
यात जिरायती १० हेक्टर, बागायती ५.५० हेक्टर, फळपिक ३०.८८ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अवकाळी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात सात तालुक्यामधील १७ गावातल्या ८७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एनडीआरएफ अंतर्गत भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.